मुंबई – अखेर संगमनेरसह राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या प्रक्रियेद्वारे एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल करता येतील. दाखल अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी मुदत संपलेल्या संस्थांच्या या निवडणुका घेण्यात येत आहेत. यावेळी महापालिका निवडणुकांबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्यात एकूण १ कोटी ७ लाखाहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत. आयोगाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक विशेष उपाययोजना केल्या आहेत, ज्यात दुबार मतदारांसाठी खास टूल वापरणे आणि महिलांसाठी गुलाबी मतदान केंद्रे (जिथे सर्व कर्मचारी महिला असतील) स्थापन करण्याचा समावेश आहे.
संगमनेरसह राज्यातील २८८ नगरपालिका, नगरपंचायतीची निवडणूक जाहीर! २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल
निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल करता येतील. दाखल अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.




मुंबई – अखेर संगमनेरसह राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

