संगमनेर – संगमनेर तालुक्याला आणि शहराला विकासाची मोठी परंपरा आहे. आपण सातत्याने निधी आणून निळवंडे पाईपलाईन, हायटेक बस स्थानक आणि विविध वैभवशाली इमारतींसारखी अनेक मोठी विकासकामे मार्गी लावली आहेत. शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव हे संगमनेर शहराचे कायमचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मागील एका वर्षात शहरात अशांतता निर्माण झाली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आगामी काळात संगमनेरमध्ये विकासासोबतच शांतता आणि बंधुभाव वाढीस लागेल, यासाठी संगमनेर सेवा समिती काम करेल, असा विश्वास लोकनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मण बाबा यांचे दर्शन घेऊन सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला, त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, निवडणूक संपल्यावर आम्ही कधीही विरोधकांमध्ये भेदभाव केला नाही, सर्वांना बरोबर घेतले. त्यामुळे संगमनेरमध्ये सुसंस्कृत राजकारणाची आदर्श परंपरा निर्माण झाली आहे. तसेच, दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगर परिषदेने केलेल्या चांगल्या कामामुळे कचरा व्यवस्थापनासह अनेक योजना मार्गी लागल्या आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिके मिळाली.
थोरात यांनी शहरातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. मागील एक वर्षापासून संगमनेर शहर अस्वस्थ झाले आहे आणि ही चिंता सर्व नागरिकांमध्ये आहे. आपल्याला आपली परंपरा जपायची आहे, संस्कृती जपायची आहे, आपले शहर जपायचे आहे. त्यामुळेच संगमनेरकर म्हणून सर्व नागरिक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत, असे आवाहन त्यांनी केले. सर्व उमेदवार संगमनेरची परंपरा जपत चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेतला आणि ‘आय लव संगमनेर’ या सेल्फी पॉइंटसमोर सर्व नागरिकांसमवेत फोटो घेतला. याप्रसंगी शिवसेनेचे अमर कतारी, उमेदवार कविता अमर कतारी, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, पप्पू नेहुलकर, प्रकाश कलंत्री, काशिनाथ आडेप, राजाभाऊ अवसक, दत्तात्रय थोरात, आकाश जेधे, लखन जेधे, सूरज बागे, सागर बागे, शुभम परदेशी, ललित शिंपी, मयूर जाधव, अंकित परदेशी, विशाल भोईर, भगवान घोडेकर, वेणू गोपाल कलंत्री, सतीश आडेप, गोविंद नागरे, किरण हासे, बाळासाहेब गुंजाळ, शंभू जवरे, गौरव जेधे, हर्षल जेधे, अल्ताफ शेख, रोहित वाळके यांच्यासह विविध पदाधिकारी आणि तरुण-युवकांची मोठी गर्दी उपस्थित होती.
तरुण व युवकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी सेल्फीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याभोवती गराडा घातला. संगमनेरी सेवा समितीच्या उमेदवारांसाठी मतदारांमधील मोठा उत्साह आणि आनंद लक्षवेधी ठरत आहे.
मागील एक वर्षात शहर अस्वस्थ! – संगमनेरच्या शांततेबद्दल बाळासाहेब थोरातांनी कळीचा मुद्दा उचलला… विकासासोबत बंधुभाव हवाच; लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद घेऊन सेवा समितीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू
अनेकांनी सेल्फीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याभोवती गराडा घातला. संगमनेरी सेवा समितीच्या उमेदवारांसाठी मतदारांमधील मोठा उत्साह आणि आनंद लक्षवेधी ठरत आहे.



संगमनेर – संगमनेर तालुक्याला आणि शहराला विकासाची मोठी परंपरा आहे. आपण सातत्याने निधी आणून निळवंडे पाईपलाईन, हायटेक बस स्थानक आणि विविध वैभवशाली इमारतींसारखी अनेक मोठी विकासकामे मार्गी लावली आहेत. शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव हे संगमनेर शहराचे कायमचे वैशिष्ट्य आहे. मात्र, मागील एका वर्षात शहरात अशांतता निर्माण झाली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आगामी काळात संगमनेरमध्ये विकासासोबतच शांतता आणि बंधुभाव वाढीस लागेल, यासाठी संगमनेर सेवा समिती काम करेल, असा विश्वास लोकनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
थोरात यांनी शहरातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. मागील एक वर्षापासून संगमनेर शहर अस्वस्थ झाले आहे आणि ही चिंता सर्व नागरिकांमध्ये आहे. आपल्याला आपली परंपरा जपायची आहे, संस्कृती जपायची आहे, आपले शहर जपायचे आहे. त्यामुळेच संगमनेरकर म्हणून सर्व नागरिक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत, असे आवाहन त्यांनी केले. सर्व उमेदवार संगमनेरची परंपरा जपत चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तरुण व युवकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी सेल्फीसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याभोवती गराडा घातला. संगमनेरी सेवा समितीच्या उमेदवारांसाठी मतदारांमधील मोठा उत्साह आणि आनंद लक्षवेधी ठरत आहे.