संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर आगारात शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्यांना थांबा देण्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागाला त्वरित निर्देश दिले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय आणि पायपीट आता थांबणार आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातून नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय कामांसाठी पुणे व नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्या संगमनेर शहरात प्रवेश न करता थेट बाह्यवळण मार्गाने पुढे जात होत्या. त्यामुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेर उतरावे लागत होते आणि तिथून त्यांना मोठा त्रास सहन करत शहरात यावे लागत होते.
प्रवाशांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन आमदार अमोल खताळ यांनी थेट नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. त्यांनी या प्रमुख मागणीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांना लेखी निवेदन सादर केले होते.
आमदार खताळ यांच्या मागणीची आणि प्रवासी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेतली. त्यांनी तत्काळ शिवनेरी आणि विनावाहक बसगाड्यांना संगमनेर आगारात थांबा देण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे संगमनेरमधील हजारो नागरिकांची गैरसोय दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तातडीच्या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.
संगमनेर आगारात ‘शिवनेरी’ आणि विनावाहक बसेसला मिळणार थांबा, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्र्यांनी दिले निर्देश
संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेर उतरावे लागत होते आणि तिथून त्यांना मोठा त्रास सहन करत शहरात यावे लागत होते.



संगमनेर, प्रतिनिधी- 
प्रवाशांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन आमदार अमोल खताळ यांनी थेट नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. त्यांनी या प्रमुख मागणीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांना लेखी निवेदन सादर केले होते.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे संगमनेरमधील हजारो नागरिकांची गैरसोय दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तातडीच्या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.