“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात
लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आलेल्या सरकारनेच महिलांना दिला धोका

यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा ढासळत चालली असून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप त्यांनी केला. भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस पक्षात नव्या पिढीला मोठी संधी असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात काँग्रेस नवीन नेतृत्व घडवेल आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यातील सध्याचे राजकारण दुर्दैवी व चिंताजनक असल्याचे सांगत, या घडामोडींकडे जनतेने सजगपणे पाहिले पाहिजे. लोकशाहीतील बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारीही जनतेचीच आहे, असे आवाहन थोरात यांनी केले.
