महायुतीत बंडखोरीची चिन्हे; शिवसेनेचं डोकं उडवण्याचं काम भाजप करत आहे: अब्दुल सत्तार यांच्या आरोपाने महायुतीत खळबळ
चार जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, तोपर्यंत सत्तारांचं हे बंड शांत होतं की महायुतीमध्ये उभी फूट पडते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.



विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे.
अब्दुल सत्तार यांच्या विधानावर आता भाजप काय पलटवार करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही तास आधी समीर सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. चार जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे, तोपर्यंत सत्तारांचं हे बंड शांत होतं की महायुतीमध्ये उभी फूट पडते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.