राज्यात 7675 ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबल्या
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपत असलेल्या राज्यातील 7675 ग्रामपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमण्यात येणार आहे. नव्याने येणाऱ्या प्रशासन राज मुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

7675 ग्रामपंचायतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 204 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान 7649 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. आठ ग्रामपंचायतची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 ग्राम पंचायतींचा यात समावेश आहे. मतदार याद्या, नव्याने करावयाची प्रभाग रचना यासाठी साधारणतः दोन-तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचा कालावधी जज-जसा संपेल तस तसे प्रशासक नियुक्तीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या तालुका निहाय ग्रामपंचायती
सर्वाधिक संगमनेर 37, अहमदनगर 28, कोपरगाव 26, पारनेर 16, शेवगाव, नेवासे 13, राहाता प्रत्येकी 12, राहुरी व पाथर्डी प्रत्येकी 11, अकोले व श्रीगोंदा प्रत्येकी 10, कर्जत 8, श्रीरामपूर 6 आणि जामखेड 3 अशा एकूण 204 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.


