महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
तालुक्यातील मेंगाळवाडी येथील मिराबाई रामभाऊ मेंगाळ या आदीवासी महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. माजी मंत्री, कॉग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून अखेर मृत महिलेच्या कुटूंबियांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची मदत मिळाली. मदतीचा धनादेश मृत महिलेच्या कुटूंबियांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये मेंगाळवाडी येथील मिराबाई मेंगाळ या आदीवासी महिलेचा मृत्यू झाला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मृत महिलेच्या कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचवेळी थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मेंगाळ कुटूंबियांना मदतही करण्यात आली होती.

माजी मंत्री थोरात यांनी प्रशासनाला तातडीने या कुटूंबियाला शासकीय मदत मिळवून देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर शासकीय स्तरावर पाठपुरावा करत ही मदत संबधित कुटूंबियांना मिळाली आहे. नुकताच दहा लाख रुपये मदतीचा धनादेश संबधितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील वाडी-वस्त्यावरील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने विविध योजना राबविल्या. ‘एक तालुका एक परिवार’ ही या संकल्पनेतून त्यांनी तालुक्यातील जनतेची कुटूंबप्रमुख म्हणून काळजी घेतली. मृत मिराबाई मेंगाळ यांच्या दुदैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला.
डॉ. जयश्री थोरात, एकवीरा फौडेशन.

मेंगाळवाडी येथे जात मृत महिलेच्या कुटूंबियांना एकविरा फौडेशनच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते जमा झालेल्या या मदतीचे पासबुक देण्यात आले. यावेळी तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष मिलींद कानवडे, राजहंस दूध संघाचे संचालक विलास कवडे, नांदुरीचे माजी उपसरपंच वकील मिनानाथ शेळके, निमगांव खुर्दचे सरपंच संदीप गोपाळे, मधुकर कानवडे, नाथु कातोरे, बाळकृष्ण गांडाळ आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


