महाराष्ट्र संवाद न्यूज
“भुजबळ साहेबांना शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता. आता एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपचे पाप ?. जंतराव….निदान न कळणारी लबाडी तरी करा” अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटद्वारे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यात सत्ताबदल झाला पण त्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधी यांची एकमेकांवर टोलेबाजी सुरूच आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे–फडणवीस यांचे सरकार आले एवढ्या मोठया सत्ता बदलानंतर आता अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
‘हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही, या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले’ असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना भाजपवर केला.
‘शिवसेनेत जी बंडाळी झाली ती शिवसेनेने कधीच केली नव्हती तर त्यामागे भाजप होतं, असंही जयंत पाटील म्हणले. यावरच आता भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला.
नेमके काय म्हणाले होते जयंतराव पाटील…
एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपाने केले आहे. “आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग मान्य करतं. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील. उद्धव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार आहे असं असतानाही निवडणूक आयोग असा निर्णय घेतो हे प्लॅनिंगने सुरू आहे’.



