महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
महाविकास आघाडीचे सरकारकडून मी बदला घेतला. अशी कबुली फडणवीस यांनी दिली आहे. ‘कटकारस्थानाचे महामेरू’ अशी पदवी उत्तम शोभू शकते त्यांना! अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेने आमच्या सोबत जी बेईमानी केली, त्या बेइमानाना त्यांची जागा दाखविण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आले आहे. अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर सरकार पाडण्यामागे फडणवीसच असल्याची टीका सुरू झाले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटद्वारे त्यांच्यावर टीका केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये पटोले म्हणाले, मविआ सरकारकडून मी बदला घेतला अशी कबुली फडणवीसांनी दिली आहे. ‘कटकारस्थानाचे महामेरू’अशी पदवी उत्तम शोधू शकते त्यांना! अशा सूड आणि द्वेषाच्या भावनेशीच तर आमचा संघर्ष आहे, म्हणूनच भारत जोडो यात्रा महत्त्वाची आहे.
‘मविआ‘ सरकार पाडून मी बदला घेतला अशी कबुली फडणवीसांनी दिली आहे. ‘कटकारस्थानांचे महामेरू‘ अशी पदवी उत्तम शोभू शकते त्यांना!
अशा सूड आणि द्वेषाच्या भावनेशीच तर आमचा संघर्ष आहे, म्हणूनच भारत जोडो यात्रा महत्वाची आहे.#BharatJodoYatra— Nana Patole (@NANA_PATOLE) November 16, 2022
नाना पटोले यांनी सरकार पाडण्यामागे फडणवीस असल्याचे स्पष्ट करत त्यांना कटकारस्थानाचे महामेरू अशी पदवी बहाल केली असल्याने पटोले यांचे हे ट्विट चर्चेत आले आहे.

