महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महसुली क्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी २८ डिसेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७(१) अनमोल लागू केलेले हे आदेश २८ डिसेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील. या आदेशानुसार कोणत्याही नागरिकास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना आपल्याजवळ शस्त्र, तलवारी, भाले, दंडुके, बंदूका, सुरे, लाठ्या-काठ्या किंवा शारीरिक इजा होऊ शकेल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही.
कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे, साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, कोणत्याही व्यक्ती अथवा मृतदेहाचे, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता या धक्का पोहोचेल, सुरक्षितता धोक्यात येईल अथवा ज्या कृतीमध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसेल अशी कोणतीही कृती, आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगभिक्षेप करणे किंवा विडंबन करणे असे चित्र, चिन्हे, फलक, इतर कोणतेही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्याचे प्रदर्शन करणे, त्याचा प्रसार करणे यासाठी मनाई करण्यात आली आहे.
यांना असेल परवानगी
शासकीय सेवेतील व्यक्तींना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव काठी वापरणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींना सदरचा आदेश लागू नसेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

