Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्ता येते आणि जातेही… सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एका दिवसात चित्र बदलेल
राजकारण

सत्ता येते आणि जातेही… सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एका दिवसात चित्र बदलेल

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 24, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : सुसंस्कृत राजकारण आणि सातत्याने होत असलेला येथील विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. सत्ता येते आणि जातेही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा एका दिवसात चित्र बदलेल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित २९ सरपंच व ३७ ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, सर्वांना सोबत घेत आपण तालुक्यात विकासाचा वेग राखला आहे. विकास कामातील सातत्य सुसंस्कृत राजकारण, समाजकारण, प्रगती यामुळे तालुका राज्यात आदर्शवत ठरला आहे. संगमनेरमधील हा विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे प्रयत्न सुरू असतात. यामुळे ते राज्याचे मंत्री आहेत की दोन-तीन तालुक्यांचे, अशी टीका करत ते म्हणाले कितीही अडचणी आला तरी तालुक्याचा विकासाची वाटचाल सुरूच राहणार असून आपल्या गावचा आणि तालुक्याचा विकास साधण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे.

ग्रामपंचायत राजकारणाचा पाया असल्याने आपण कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतला नाही. तरीदेखील आपल्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये चांगले यश मिळविले. निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असली तरी निवडणुकीनंतर सर्वांनी एकत्र आले पाहिजे की आपली परंपरा आहे. मंत्रीपदाच्या कार्यकाळात काम करताना आपण अनेकांना मदत केली. निळवंडे कालवे आणि तालुक्याच्या विकासासाठी निधी आणला. निळवंडेचे पाणी ऑक्टोंबर 22 पर्यंत लाभार्थ्यांच्या शेतात पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र सरकार बदलले आणि गतीने सुरू असलेली ही कामे थांबली.

भारत जोडो अभियान राज्यात आपण यशस्वी केले. राज्य स्तरावर आपल्याकडे मोठी जबाबदारी आहे. अडचणीच्या काळ लवकरच संपणार असून तालुक्याची यशस्वी वाटचाल सर्वांच्या साथीने पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, 

निवडणुका लोकशाहीमधील अविभाज्य भाग आहेत. तालुक्याला आमदार थोरात यांचे चांगले नेतृत्व मिळाले असल्याने येथील वातावरण अत्यंत चांगले आहे. येथील सहकार, शिक्षण, समाजकारण प्रगतीच्या शिखरावर आहे. हा तालुका इतरांसाठी मॉडेल आहे. निळवंडेसह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प थोरात यांनी राबवले असून बाह्यशक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करून तालुक्याच्या विकासात खोडा निर्माण करत आहे. 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 92
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

By अनंत पांगारकरJuly 16, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: फेसबुकवरील आकर्षक जाहिरातीला भुलून जिओ कंपनीचा पेट्रोल पंप आणि त्याचा…

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026

समरवीर देशमुखची राज्यस्तरीय कौशल्य चाचणीत चमकदार कामगिरी; बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत मिळवला प्रवेश

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.