सह्याद्रीच्या डोंगररांगात मे महिन्यात आंबा, जांभळाच्या सिझन बरोबरच “करवंद” या फळाचा सिझन चालू होतो. करवंदाचे झाड झुडुपासारखे पसरलेले असते. त्याला काटे असतात. डोंगरावर ते नैसर्गिकपणे आलेले असतात. डोंगरावर यांच्या जाळी पसरलेल्या असतात. दाट व घट्ट जाळीत शिरता येत नाही. उन्हाळ्यात डोंगर रांगेतील घाटात त्या भागातील नागरिक झाडांचे पानाची टोपली करून त्यात “करवंदे” ठेवून विकायला बसतात. हे बघून आपण थांबतोच व करवंदे घेतो.
माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात व भाऊ बाळासाहेब थोरात आम्हाला मे महिन्याच्या सुट्टीला आलेल्या सर्व मुलांना घेऊन माळशेज घाटात व इतर डोंगरावर करवंद खायला नेत. व करवदांच्या जाळ्यांमध्ये जाऊन आम्ही मोठे मोठे पिकलेले करवंदे खायचो. त्याचा आनंद आम्ही विसरू शकत नाही. करवंदाचे लोणचे करतात. त्यात “क” जीवनसत्व असते.
डोंगर दऱ्यातील माणसे शहरामध्ये रस्त्यावर “करवंदे” विकायला बसतात. करवंदाला “डोंगरची काळी मैना” म्हणतात. करवंदे जितके काळे तितके गोड व पिकलेले असते. म्हणून या महिन्याभरात भरपूर करवंदे खा. किंमतीची घासाघीस करू नका. डोंगरातील माणसे ते करवंदे काट्या-कुट्यातून तोडून लांबचा प्रवास करून शहरात आपल्यासाठी घेऊन येतात. निसर्गाचा आनंद घ्या, हे नैसर्गिक फळे खा.
निसर्ग प्रेमी माझी भाची सवि_परीख “करवंद” खाण्याचा आनंद घेतांनी.
दुर्गा सुधीर तांबे, मा. नगराध्यक्ष, (अध्यक्ष, जयहिंद महिला मंच, संगमनेर, जि. अहमदनगर), मो. नं. 9822553254.

