महाराष्ट्र संवाद न्यूज
रविवार विशेष | ज्ञानेश्वर गायकर
देशाचे नेते शरद पवार यांनी शनिवारी दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दोन कार्यकारी अध्यक्ष मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांची नियुक्ती करण्यात आली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी देऊन अन्य खासदारांना काय जबाबदारी देता येईल, याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरवली असली तरी, संघटनात्मक जबाबदारीमध्ये अजित पवार यांना कोणतेही स्थान मिळाले नाही. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी ह्या सर्व बाबींचे स्वागत केले आहे. पुढे अजितदादाच राज्याचे मुख्यमंत्री असणार हेही पवारसाहेबांनी अधोरेखित केले.
याबद्दल मीडिया, अंध भक्त आणि घाणेरडा आयटी सेल यांनी रान उठवले आहे. दुसऱ्याच्या पक्षात, दुसऱ्याच्या घरात कायम लक्ष घालायचं आणि त्या पक्षाला बदनाम करायचं, असा ह्या आयटी सेलचा डाव असतो. ह्या आयटी सेलला फार किडा असतो. कारण हे समाजकंटक असतात. त्याला कोणतेही संवेदना नसतात. मुळात सत्ताधारी यांनाच संवेदना नाहीत, अन् संवेदना नसलेला पक्ष आज सत्तेत आहे.
वाढलेले वीज बिल, पेट्रोल, डिझेलच्या किमती जगात कमी होत आहेत,पण आपल्या देशात कमी होत नाही. पेट्रोल डिझेल किंमती सुमारे ३०% ने कमी होऊ शकतात. पण दिवसाढवळ्या नागरिकांची लुटमार चालू आहे. बेरोजगारी बाबत न बोलले तर बरच आहे. रोज कोटीच्या जॉबची घोषणा होते, घोषणा फक्त कागदावर असते. मात्र दुसरीकडे रोज हजारो कामगार कामावरून कमी होत आहेत. देश आणि राज्याची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यास पैसे नाही. ही जबाबदारी आता कर्मचारी अन् अधिकारी एक दिवसाचा पगार देऊन करणार आहेत. राज्य दिवाळखोरीत जाईल अशी भीती आहे.
अशा परिस्थितीत राज्यात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून ह्या सर्व गोष्टीवरून लक्ष विचलित करण्याचे काम सध्या राज्यात चालू आहे. विरोधकांना संपवायचा बाबी पुढे येत आहेत. अमरावतीच्या एका गिधाडाने शरद पवारांना तुमचा दाभोळकर करू असे समाज माध्यमावर लिहिले. तो गायब आहे.
बावनकुळे म्हणतात ही धमकी नाही. सडक्या विचाराची कायम तोंडातून घान ओकनारी, अन् घरात संस्कार नसलेली गिधाडे आज पवार साहेबांच्या मरणाची वाट पाहत आहेत. त्यांना अजून माहिती नाही, त्यांचे अन् त्यांच्या विचारसरणीच्या दहावे, तेराव्याची, बुंदीचे जेवण जेवून पवार साहेब ह्या देशात जनसेवा अहोरात्र अजूनही करतील. गिधाड संस्कृतीची काय लायकी आहे, हे त्यांनी तपासावे. रोज हे अन्न खातात की आणखी काही हेही तपासले पाहिजे.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आता आक्रमक झाले पाहिजे. यांना सबक शिकवली पाहिजे. ह्या कृतीतून त्यांना जरब शिकवली पाहिजे. त्यांना पुन्हा असे कृत्य न करण्याची भीती निर्माण झाली पाहिजे. भाजपला देशात फक्त शरद पवार ह्या वादळाची भीती आहे. राज्यात आज निवडणुका झाल्या तर भाजप भुईसपाट होत आहे. धार्मिक चकमक हेच त्यांचे उद्दिष्ट असावे. समाजातील एक एक गिधाड टिपून त्याला चांगल्या संस्काराची शिदोरी संयमाने राष्ट्रवादीने द्यावी. धमक्या देणाऱ्यांच्या मातापित्यांनी त्यांना कदाचित चांगले संस्कार दिलेही असतील. पण सध्या ते ज्यांच्या ताब्यात गेले आहेत, त्यांचे संस्कार चांगले नाहीत. म्हणून तर तुमचा दाभोळकर करू असे विधाने करत एक-एक गिधाड तयार होत आहे.

