महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी महात्मा गांधी यांच्या विषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामळे चांगलेच वादात सापडले असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला जाणीवपूर्वक राजकीय रंग न देण्याचे आवाहन करताना संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो कोणाच्याही विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले फडणवीस: महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे अनुचित आहे. भिडे गुरुजींनी नव्हे तर कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यांमुळे करोडो लोकांमध्ये संताप निर्माण होतो. लोक गांधीं विरोधात बोललेले सहन करणार नाही. या संदर्भात जी उचित कारवाई आहे, ती राज्य सरकार करेल.
राजकीय रंग नको: संभाजी भिडे स्वतःची संघटना चालवितात. त्यांचा भाजपशी काही संबंध नाही. त्यामुळे याला जाणीवपूर्वक रंग देण्याचे काही कारण नसून या प्रकाराचा निषेध करत काँग्रेसचे लोक जसं रस्त्यावर उतरतात तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अत्यंत गरजेचे भाषेत ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्यावेळी त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे मात्र त्यावेळी ते मिंधे होतात, असा टोला काँग्रेसला लगावला आहे.
????1.15pm | 30-07-2023????Nagpur | दु. १.१५ वा | ३०-०७-२०२३????नागपूर.
LIVE | Media interaction. https://t.co/c5kGuTw7kd— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 30, 2023
महात्मा गांधी बद्दल संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते: बडनेरमधील जय भारत मंगलम येथील सभेत बोलताना, महात्मा गांधी यांचे वडील करमचंद नसून एक मुस्लिम जमीनदार होते, मोहनदास गांधी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लिम पालकाने केले, असं विधान केलं होतं.

