Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे एकाच दिवशी पती-पत्नीचा गूढ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह शेततळ्यात, तर पतीचा मृतदेह घरात संशयास्पदरीत्या आढळला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, याबाबतचे गूढ कायम असून, आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी नंदा गायकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. रेवजी गायकर हे एका शिक्षण संस्थेत नोकरीला होते आणि तीन वर्षांपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शेती आणि निवृत्ती वेतनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून, सर्वांचे विवाह झाले आहेत. मुली सासरी असतात, तर…

Read More

मुंबई, ११ जुलै २०२५:  आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर येथे भुयारी गटार साफ करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात मांडली. याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली असली तरी देखील अपूर्ण काम असताना गटार जोडणाऱ्या आणि या घटनेला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी तांबे यांनी यावेळी लावून धरली. आमदार तांबे यांनी संगमनेर मधील दुर्दैवी घटने संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर भुयारी गटार योजना २०१२ मध्ये मंजूर झाली होती, परंतु एसटीपीच्या जागेच्या वादामुळे हे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण होते.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरमधील मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ या उत्पादनात भेसळ असल्याच्या पुण्याच्या कियान लॅबच्या अहवालाने खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, गुळाच्या तपशीलामध्ये तफावत आढळली असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घालून दिलेल्या नियमांनुसार त्याचे मानांकन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान या संदर्भात वारंवार अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करत कारवाईची मागणी करून देखील अन्न औषध प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. घुलेवाडी येथील रहिवासी शंकर रावसाहेब ढमाले यांनी २८ मे २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. ढमाले यांनी १६ मे २०२५ रोजी सागर किराणा येथून गुळ खरेदी केला…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार साफसफाई दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कर्मचाऱ्यासह स्थानिक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेच्या एसटीपी प्रकल्पाचे मुख्य ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनी आणि बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी कोल्हेवाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज:  महायुती सरकारच्या कार्यकाळात दिवसेंदिवस लाचखोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कोणत्याही कामाच्या मोबदल्यात हल्ली लाखो रुपयांची लाच सर्वसामान्यांकडून मागत असल्याने या अधिकाऱ्यांना भिकेचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे.  बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी रंगेहाथ पकडले. सिमेंट रस्त्याच्या बिलापोटी आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे एकूण 12 लाख रुपयांची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या नगर उत्थान योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण यांनी 3 टक्के दराने 6 लाख रुपयांची मागणी केली होती.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  गुरु पौर्णिमेचा दिवस संगमनेरकरांसाठी धक्कादायक आणि दुःखदायक ठरला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. गटारात काम करत असताना गटारीमध्ये निर्माण झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध पडून अतुल रतन पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ या दुर्घटनेतील दुसऱ्या जखमीचा हे मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे. रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गटारीच्या (ड्रेनेज) कामावेळी विषारी वाळूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध होऊन जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न या तरुणाने केला होता. मात्र हा तरुण देखील वायूच्या संपर्कात आल्याने तो देखील…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज (गुरुवार, ११ जुलै) एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून, कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतुल रतन पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी अशी जखमींची नावे असल्याची व जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्या न्यायालयाने संगमनेर शहरातील एका मारहाण प्रकरणी नुकताच निकाल दिला असून यात एका आरोपीला दोषी ठरवत अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. २४ जून, २०१५ रोजी राजाराम लक्ष्मण कढणे (तक्रारदार) यांनी संगमनेर बसस्थानकाजवळील गणेश फ्रूट्स येथून आंबे खरेदी केले होते. त्यातील दोन आंबे खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी ते पुन्हा दुकानात गेले असता, अमोल अशोक भवर याने आंबे परत घेण्यास नकार दिला आणि पैसे देण्यासही नकार दिला. त्यानंतर भवर यांच्यासह तिघा जणांनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. आयुब कादर इनामदार याने तक्रारदाराला जीवे मारण्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संगमनेर ते शिर्डी पायी दिंडीत सक्रिय सहभाग घेतला. या दिंडीदरम्यान डॉ. थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना सेवा पुरवली. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागातून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या अनेक दिंड्यांसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली. या दिंडीत डॉ. जयश्री थोरात यांनी स्वतः पायी चालत, साई भजने गात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी साई भक्तांना प्रसाद वाटप, आरोग्य तपासणी आणि इतर आवश्यक व्यवस्थांमध्येही सक्रिय योगदान दिले. यावेळी बोलताना डॉ. जयश्री…

Read More

मुंबई:  नगर पालिका हद्दीत आणि हद्दीलगत नागरी वस्तीत लागू असलेल्या तुकडाबंदी कायद्यामुळे बाधित झालेल्या लाखो कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेले सर्व तुकडाबंदी व्यवहार नियमित केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. सद्यस्थितीत तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा घेतलेल्या नागरिकांना बांधकाम करण्यास किंवा त्या जागांचे व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, महसूलमंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिका,…

Read More