Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नवनियुक्त नाशिक महानगरप्रमुख सुनील बागुल यांचे खंदे समर्थक मामा राजवाडे यांच्यासह अन्य काही जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून तोडफोड करणे, मारहाण करणे, चोरी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएस समर्थक आणि सराफ व्यावसायिक किशोर उर्फ गजू घोडके यांनी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्या गैरव्यवहाराचे आरोप करणारे व्हिडिओ २७ जून रोजी फेसबुकवर अपलोड केले होते. बागुल यांनी समाजसेवेच्या नावाखाली पैशांचा गैरव्यवहार करत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप घोडके यांनी या व्हिडिओतून केला होता…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि बुद्रुकला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन प्रवरा नदीवरील पुलासह राज्यातील जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली आहे. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामांच्या दिरंगाईवरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार खताळ यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. प्रवरा नदीवरील हा पूल वाहतुकीसाठी जुना झाला असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. याचवेळी, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारी रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. शासन निधी उपलब्ध करून देत असतानाही कामे वेळेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत न्यायालयाच्या दोन लिपिकांना 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. भाडेकरूकडून सदनिकेचा ताबा मिळवून देण्यासाठी या लिपिकांनी सदनिका मालकाकडून लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाचे लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (40) आणि अमित बबन भुसारी (34) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात कार्यरत आहेत. सिंहगड रोड येथील हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क सोसायटीत तक्रारदारांची सदनिका आहे, ती त्यांनी भाड्याने दिली होती. भाडेकरू सदनिका सोडण्यास तयार नसल्याने तक्रारदारांनी भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल…
अहिल्यानगर: प्रेमाचे नाटक करत, अल्पवयीन मुलीचे (वय १७) फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने सोमवारी (३० जून) पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कर्जत येथील एका अल्पवयीन मुलावर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी कर्जत येथील महाविद्यालयात शिकत असताना, डिसेंबर २०२४ मध्ये तिची व्हॉट्सअॅपवरून संशयित आरोपीशी ओळख झाली. जानेवारी २०२५ मध्ये त्यांची कर्जत येथील कॅफेमध्ये पहिली भेट झाली. यानंतर मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नकार दिल्यानंतर, पीडिता ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी अहिल्यानगर येथे आली. याच…
जामखेड: जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात बाजार समितीच्या १२ सदस्यांनी सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला आहे. वराट हे बाजार समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याची तक्रार या सदस्यांनी केली असून, त्यांना उपसभापती पदावरून दूर करण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नुसार, जिल्हाधिकाऱ्यांना असे पत्र मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत समितीची विशेष सभा बोलावून या विषयावर समिती सदस्यांच्या मतदानाद्वारे निर्णय घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर…
संगमनेर, प्रतिनिधी- खरीप हंगामाच्या सुरुवातीला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असली तरी, युरियाच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत राज्याचे माजी कृषी मंत्री आणि काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार, कृषी विभागाने सोमवारी शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाला बफर स्टॉक मधील 50% युरिया तात्काळ उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्याला सरकारने सातत्याने मदत करावी, अशी भूमिका थोरात यांनी नेहमीच मांडली आहे. थोरात यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात गौण खनिज आणि वाळू तस्करीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तालुक्यातील चारही दिशांना वाळू, मुरूम, खडी, डबर आणि मातीसारख्या गौण खनिजांची सर्रासपणे तस्करी सुरू आहे. निमज गावाच्या शिवारात खासगी रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा अवैध उपसा करून वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती स्थानिक तलाठी यांना मिळाल्यानंतर, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतला. मात्र, कारवाई सुरू होताच जेसीबीसह इतर ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत. राजकीय दबावामुळे कर्मचारी आणि…
संगमनेर, अहिल्यानगर: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरच्या जमजम कॉलनीत एका पत्र्याच्या गोदामावर छापा टाकून 2700 किलो गोमांसासह एकूण 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या कारवाईत देखील आरोपी नेहमीप्रमाणे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस अवैध कत्तलखान्यांवर नियंत्रण असल्याचा कितीही दावा करत असले तरी, स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे त्यांचे पितळ उघडे पडले. संगमनेरातील गोवंश कत्तली राजरोसपणे सुरू असल्याचे आणि स्थानिक पोलिसांचा याकडे असलेला अक्षम्य हलगर्जीपणा पुन्हा एकदा यामुळे समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहर आणि तालुका हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच एकसंध परिवार म्हणून राहिला आहे, मात्र काही लोक राजकारणासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करत आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून यंग नॅशनल ग्राउंडच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, हे काम कोणी थांबवले, हे सर्वांना माहीत आहे, असे अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद शेख यांनी म्हटले आहे. जावेद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या विभागात विकासाच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. एसटीपी प्लांटच्या जागेचा वाद असो किंवा इतर विकासकामे, नेतृत्वाने नेहमीच सर्व जनतेला…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: महायुती सरकारने तृतीय भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या आपल्या निर्णयाला अखेर स्थगिती दिली आहे. मराठी भाषिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत असताना, ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि आदित्य ठाकरे) प्रस्तावित मोर्च्याआधीच हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून हा निर्णय मराठी भाषेवर अन्याय करणारा असल्याची टीका होत होती. या वाढत्या विरोधाची दखल घेऊन सरकारने हा निर्णय मागे…
