Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘वाट चालताना’ या पुस्तकात डॉ. संतोष खेडलेकर यांनी उत्तमचंदजी सरनोत यांचे केलेले व्यक्तिचित्रण म्हणजे एका खऱ्याखुऱ्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाच्या आयुष्याचा पट आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या ‘वाट चालताना’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या.लोणी (ता. राहाता) येथील उत्तमचंद सरनोत यांच्या आयुष्यावर आधारित ‘वाट चालताना’ हे चरित्रात्मक पुस्तक डॉ. खेडलेकर यांनी नुकतेच लिहिले. एका व्यापारी माणसाच्या आयुष्यातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्हा परिषदेचे घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.शहर पोलीस ठाण्यात याबाबत घुलेवाडी येथील कविता संतोष अभंग यांनी फिर्याद दिली आहे. अभंग यांनी आपल्या मालकीच्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांना बसावयास परवानगी दिल्याचा राग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिताराम राऊत यांना आला. राऊत यांनी गावातील तलाठी कार्यालय येथे अभंग यांचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच गैर कायद्याची मंडळी जमीन त्यांच्या घराचे नुकसान केले.या आशयाच्या अभंग यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर-मनमाड या महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूक विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन आहे. अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा-संगमनेरमार्गे नाशिककडे किंवा विळद घाट-दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्ग वळविण्यात येणार आहे. शनि शिंगणापुर /सोनई रोडवरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाचा रात्री मोठा निर्णय समोर आला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे यांच्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे गटाचे नाव यापुढे ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे असेल. त्यांच्या गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले असून चिन्हासाठी त्यांच्याकडून पुन्हा पर्याय मागविण्यात आला आहे.शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविले होते तसेच शिवसेना हे नाव वापरण्यास दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती त्यामुळे आयोगाने दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्हाबाबत पर्याय मागविले होते सोमवारी आयोगाने या पर्यायांवर निर्णय घेतला उद्धव ठाकरे यांनी मशाल या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपल्यावरील टीकेला टीकेने उत्तर देण्याची गरज नसून कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेताना शंभर दिवसातील आपले निर्णय जनतेसमोर न्या, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविल्याने ते आता कोणत्याच गटाला मिळणार नाही. यावरून सध्या ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही गटाला आता नवे नाव आणि चिन्ह शोधावे लागणार आहे, या पार्श्वभूमीवर आपल्या गटाच्या शिवसेनेचे नवे नाव आणि चिन्ह काय असावे यावर विचार विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त केली. यावेळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निवडणूक चिन्ह गोठविण्यापर्यंत ठीक आहे मात्र पक्षच वापरायला बंदी घालण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अभूतपूर्व म्हटला पाहिजे. देशाच्या इतिहासात असा निर्णय कधीच झाला नाही. शिवसेना संपविण्यासाठी भाजपने कशी पाऊले टाकली हे सर्वांना दिसत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.शिवसेनेवरून ठाकरे शिंदे गटातील वाद दावे प्रति दावे राज्यासह संपूर्ण देश बघत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून फक्त शिवसेना हे नाव देखील वापरण्यास दोन्ही गटांना मज्जाव केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह आयोगाला देण्यात आले आहे. याबाबत आयोगाचा निर्णय प्रतीक्षेत आहे.पाथर्डीमध्ये आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संगमनेर तालुक्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच, सांगलीतील बिळूरमध्ये एका तलावात तीन मुलींसह आईचा मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह तलावा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.सुनिता माळी (वय ३० वर्ष), अमृता (वय १३ वर्ष), अश्विनी (वय १० वर्ष) आणि ऐश्वर्या (वय ७ वर्ष) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या संदर्भातील नेमकी घटना काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घटनास्थळी आढळलेल्या कपडे आणि कपडे धुण्याच्या साबणावरून प्राथमिक अंदाजानुसार सुनिता आपल्या मुलींसह या तलावावर कपडे धुण्यासाठी आल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यात संगमनेर महसूल उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पंधरा दिवसाच्या या कार्यकाळात तब्बल १९५२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.सर्वसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता. विकासाचे विविध उपक्रम राबवण्यासोबत प्रशासन जनतेचे प्रश्न, तक्रारी निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील असते. पण, अनेक प्रकरणात काही कारणामुळे किंवा काही शुल्लक चुकांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असतात; नियमित प्रक्रियेत मागे पडतात. यामुळे संबंधिताना व्यवहारात अडचणी येऊ शकतात, अशी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचा संगमनेर महसूल उपविभागाने पुरेपूर उपयोग करून घेतला.या पंधरवड्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून शिवसेना या एका नावालाही दोन्ही गटांसाठी परवानगी नाकारली आहे. यामुळे ठाकरे-शिंदे गटाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव काय असेल, हे आता निवडणूक आयोगाच्या हाती राहणार आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यास मनसैनिकांना राज ठाकरेंनी बंदी घातली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करत आपली भूमिका योग्य वेळेस मांडणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ चिन्हच गोठविले नाही तर शिवसेना देखील संपविल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. या संदर्भात राजकीय गोटातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चार बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांविरोधात अखेर घारगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हौशीराम बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज वितरण कंपनीच्या तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायरमन भालेराव (पूर्ण नाव माहित नाही), जालिंदर लेंडे (पूर्ण नाव माहित नाही) आणि साहेबराव शिवाजी लेंडे (दोघे रा. खंदरमाळ, ता. संगमनेर अशी आरोपींची नावे आहे. आरोपी पैकी विजय सयाजी भालेराव याला अटक करण्यात आली आहे.शनिवारी वांदरकडा खंदरमाळवाडी येथे असलेल्या…

Read More