Author: अनंत पांगारकर
संगमनेर: शुक्रवारी रात्री घोडेकर मळ्यामध्ये म्हाळुंगी नदीच्या पुलावर गुन्हेगारांकडून घरी परतणारा तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी असलेल्या या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात प्रभाग १३ मधील रहिवाशांनी एकत्रित येत सराईत गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शुभम सुरेश भोईर हा तरुण कापड दुकानातील काम संपवून घरी परतत असताना साईनगर परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पुलावर काही सराईतानी त्याला अडवले. त्याच्याकडून पैसे जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुभम भोईर याने विरोध करताच, या गुन्हेगारांनी त्याला जबर मारहाण केली, तसेच धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या गुन्हेगारी कृत्यामुळे संगमनेर…
संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्यात झपाट्याने विकास करत असलेल्या संगमनेर शहराची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक मोठी गरज आता पूर्ण झाली आहे. दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक गाठावे लागत होते, मात्र ही कुचंबना आता थांबली आहे. संगमनेरकरांची वाढती मागणी आणि मनोरंजन क्षेत्रातील उणीव लक्षात घेत, मालपाणी उद्योग समूहाने शहरात अत्याधुनिक मालपाणी मल्टिप्लेक्स सिनेमागृह उभारले आहे. अगदी महानगरांच्या तोडीच्या सुविधांनी सज्ज असलेल्या या मल्टिप्लेक्सचे शानदार उद्घाटन शुक्रवारी (दि. १७ ऑक्टोंबर) मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललितादेवी व श्रीमती सुवर्णाकाकी मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून (शनिवार) हे चित्रपटगृह नवीन चित्रपटांसह लोकसेवेत रुजू झाले असून, संगमनेरमध्ये मनोरंजनाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली…
अहिल्यानगर – श्रीगोंदा तालुक्यातून एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गुजरात राज्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे अपहृत मुलीची सुटका झाली असून, तिच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी मिळून येत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी उपोषणकर्त्यांना मुलीचा तात्काळ शोध घेण्याचे आश्वासन दिले आणि स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने आरोपीला ताब्यात घेऊन मुलीचा शोध घेण्याचे आदेश…
आज धनत्रयोदशी असल्यामुळे काही राशींना विशेष धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. मेष (Aries) – आजचा दिवस आनंददायक आणि उत्साही असेल. तुमच्या जोडीदाराला प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. नोकरीमध्ये यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करा. अध्यापन, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांना यश आणि पदोन्नतीचे योग आहेत. धनलाभाचे योग आहेत, जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus) – आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आणि आरामदायी असेल. कामाची वेळेवर पूर्तता आणि प्रभावी आत्मविश्वासाच्या बळावर तुम्हाला दिवसभर शांतता व समाधान मिळेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक ताण कमी होईल. मिथुन…
अहिल्यानगर – राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला. सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब, कष्टकऱ्यांच्या पाठिशी कर्डिले नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले. सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार, प्रेम व स्नेह होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण…
संगमनेर – शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक विकासाला मोठा आधार मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून, शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व अनमोल आहे. भाकड जनावरांसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केली. राजहंस दूध संघ येथे आज (शुक्रवार १७ ऑक्टोंबर) वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हॉइस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक संतोष मांडेकर, विलास कवडे, गोरखनाथ नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले की, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध…
संगमनेर – माजी मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. थोरात म्हणाले की, कर्डिले यांच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी आणि ‘ग्रामीण शहाणपण’ असलेले लोकनेते हरपले आहेत. अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दुग्धविकास मंत्री म्हणून काम केलेले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांची भावना जाणणारे नेतृत्व होते, असे थोरात यांनी नमूद केले. तसेच, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे काम प्रभावी ठरले. मुद्देगिरीने बोलणारे आणि माणसांची कदर करणारे नेतृत्व गमावल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड…
संगमनेर – वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या माध्यमातून देशभरात नावलौकिक मिळवणाऱ्या मालपाणी उद्योग समूहाने आता संगमनेरच्या मनोरंजन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. शहराच्या सांस्कृतिक जीवनात गेल्या अनेक वर्षांपासून जाणवणारी अत्याधुनिक चित्रपटगृहाची पोकळी भरून काढत, या उद्योग समूहाने दोन पडद्यांचा समावेश असलेल्या ‘मालपाणी मल्टिप्लेक्स’ची उभारणी केली आहे.आज (शुक्रवार, दि. १७) सायंकाळी या मल्टिप्लेक्सचा भव्य शुभारंभ होत आहे. या नव्या मल्टिप्लेक्समुळे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना लोणी किंवा नाशिक येथे करावी लागणारी ‘वारी’ आता थांबणार आहे. ‘गाय छाप’मुळे देशात परिचित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाने गेल्या दोन दशकांत वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या क्षेत्रात मोठी व्यावसायिक क्रांती घडवली आहे. शिर्डी येथील वॉटरपार्कपासून सुरू झालेला हा प्रवास आशिया खंडातील…
संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तांबे म्हणाले की, ‘प्रस्थापित नसतानाही आपल्या कर्तृत्वाने दोन दशकांहून अधिक काळ अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे कर्डिले साहेबांचे जाणं अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारं आहे. दुःख व्यक्त करताना नेमकं काय म्हणाले तांबे… प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून मागील दोन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वातून एक वेगळाच दबदबा निर्माण करणारे माजी मंत्री, राहुरी विधानसभेचे आमदार व अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि…
अहिल्यानगर: भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मंत्री आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून कर्डीले यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे शिवाजीराव कर्डीले यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तेथे आणण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. राहुरीच्या आमदारकीसोबतच शिवाजीराव कर्डीले यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपदही होते. अनेकदा…
