Author: अनंत पांगारकर

मुंबई, दि. १८ मार्च: प्रतिनिधी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. अर्ज छाननी दरम्यान एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. या निवडणुकीत भाजपचे तीन, शिंदे गटाच्या शिवसेनेचा एक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. विजयी उमेदवार –   * दादाराव केचे (भाजप)  * संजय केणेकर (भाजप)  * संदीप जोशी (भाजप)  * चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट शिवसेना)  * संजय खोडके (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस) महायुतीच्या या पाच उमेदवारा व्यतिरिक्त आणखी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवाराने सादर केलेल्या अर्जात आवश्यक…

Read More

संगमनेर, दि. १८ – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवारी (२० मार्च) होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार मंत्री थोरात कारखाना साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव कारखान्याने देत शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यावर्षी विक्रमी उत्पादन करताना ऊस उत्पादकांना प्रति टन ३०००/- रुपये ॲडव्हान्स पेमेंट अदा केले आहे. तर आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. यावर्षीच्या…

Read More

अकोले, दि. १९ मार्च – प्रतिनिधी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील आंबड येथील गवनेर दामू सरोदे यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून ग्रामस्थांचा अकोलेकरांनी सोमवारी (17 मार्च) कोल्हार घोटी मार्ग बराच काळ रोखून धरला होता. दरम्यान या प्रकरणावरून अकोल्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गवनेर सरोदे याच्यावर कारवाईसाठी सामाजिक संघटना नेते कार्यकर्ते अंबड ग्रामस्थांचं अकोले सरांनी महामार्गावर रास्ता रोको करत टायर जाळत निषेध व्यक्त केला. शिवसेना (ठाकरे) तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलग, मनसे अध्यक्ष दत्ता नवले, रोहिदास जाधव, रामदास भोर आदीसह नागरिक उपस्थित होते. महापुरुषांबद्दल…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने यापूर्वी केलेली मागणी विरळत नाही तोच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आगामी मुख्यमंत्री हे अजित पवार असतील असं सांगायला सुरुवात केल्याने महायुतीतील भाजपमध्ये पुन्हा एकदा चलबिचल सुरु झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. “येत्या काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील,” असा दावा त्यांनी केला. पक्षप्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून भविष्यात तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील,” असं मत बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं. पुढं ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चांगलं काम करतायत. परंतु,…

Read More

अहिल्यानगर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २५ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

संगमनेर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. सर्वांनी मतभेद विसरून एकत्र जयंती करावी ही आपली पद्धत राहिली. मात्र यावेळेस वेगळे चित्र पहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. रविवारी रात्री संगमनेर बस स्थानकांच्या प्रवेशद्वारापाशी स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत देखाव्यासाठी आलेल्या माजी मंत्री थोरात,…

Read More

संगमनेर, दि. १७ मार्च – प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांनी जगाला दिशा दाखविली. त्यांच्या जयंतीमध्ये कसले राजकारण करता असा सवाल उपस्थित खरंच शिवजयंती निमित्ताने मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण करत प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. रविवारी रात्री संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्याचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तांबे बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत देखाव्यासाठी आलेल्या माजी मंत्री थोरात, आमदार तांबे यांचे…

Read More

संगमनेर, दि. १६ मार्च – प्रतिनिधी छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार कपिल पाटील यांनी दिला आहे. मंत्री नितेश राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीचे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारती संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील छात्र भारतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयावर संगमनेरमध्ये मोर्चा काढला होता. शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी संगमनेर नगर परिषदेत आले होते त्यावेळी मारहाणीची घटना घडली. मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची तक्रार देखील अद्यापपर्यंत पोलिसांनी नोंदवलेली नाही. तसेच मारहाण…

Read More

रविवार, दि. १६ मार्च – राज्य सरकार येत्या आठवडाभरात नवे सर्वसमावेशक असे वाळू धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूरमध्ये केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात घरकुलांची काम सुरू आहे. या घरकुलांच्या कामासाठी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात मोफत वाळू उपलब्ध केली जाणार आहे. तसेच राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरच्या दगड बारीक करून वाळू तयार केले जाणार आहे. पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे पारंपरिक नदीतील वाळूची मागणी यामुळे कमी होईल असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव झाले नाही आणि…

Read More

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या सामाजिक सलोख्याला गालबोट लावणार्‍या सनातन्यांचा धीर दररोज चेपला जातो आहे. आपल्यावर कारवाई होणार नाही, अशी खात्रीच त्यांना पटल्याने काहीही करायचा मार्ग त्यांनी अनुसरला आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेच आहे पण जे उत्तर प्रदेशमध्ये घडायचं ते महाराष्ट्रात घडू लागलंय याचं वैषम्य वाटू लागलं आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे विश्‍वासाने पाहिलं जात होतं ते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि त्यातही सार्‍या गृह विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना सनातनी ज्या पध्दतीने मान वर काढत आहेत, ते पाहिलं की राज्याचं काही खरं नाही, अशी भीती वाटू लागते आहे. देशभर सुरू असलेल्या होळीच्या पार्श्‍वभूमीवर राजापूरमध्ये घडलेल्या अघटीत घटनेने राज्याची मान शरमेने…

Read More