Author: अनंत पांगारकर
शनिवार, २३ नोव्हेंबर – संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे निकाल समोर आले आहे. समोर आलेल्या निकालामध्ये महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रत्येकी चार-चार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहे. तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ एकेका जागेवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून त्यांना तब्बल १,२४,६२४ एवढे मताधिक्य मिळाले आहे. त्या पाठोपाठ भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ७०२८२ एवढ्या मताधिक्याने आणि भाजपाचे विक्रम पाचपुते ३६८२७ एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहे. …
संगमनेर – प्रतिनिधी विधानसभा निवडणूक मतमोजणीनंतर उमेदवारांच्या समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीत बस स्थानक चौकात गर्दीतून वाहन चालकांना वाट काढून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला वाहनाचा धक्का लागल्याने ते गंभीर जखमी होऊन पायाला इजा झाली आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. संगमनेर बस स्थानक चौकात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केल्याने वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे (आर्थिक गुन्हे शाखा) हे बस स्थानक चौकात बंदोबस्त करीत असताना गर्दीत एका वाहन चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाच्या धडकेत त्यांच्या पायाला इजा झाली आहे. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बस स्थानकासमोर हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश…
शनिवार २३ नोव्हेंबर – संगमनेर संगमनेर विधानसभा मतदारसंघात चार दशकानंतर प्रथमच परिवर्तन बघावयास मिळाले असून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार अमोल खताळ यांनी राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव केला. राज्यातील दिग्गजांच्या भराभवांमध्ये हा पराभव गणला जात असून नवखे उमेदवार असलेले खताळ राज्याच्या राजकारणात पोहोचले आहे. उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे… अमोल खताळ (महायुती) – ११२३८६ मताधिक्य – १०५६० बाळासाहेब थोरात (महाविकास आघाडी) – १०१८२६ अजीज ओहोरा (वंचित बहुजन आघाडी) – २०६९ योगेश सूर्यवंशी (मनसे) – १२८५ दत्तात्रय ढगे (अपक्ष) – ५४७ शशिकांत दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) – २२६ भारत भोसले (समता पार्टी) – १७४…
महाराष्ट्र संवाद न्यूज – प्रतिनिधी शनिवार, २३ नोव्हेंबर राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि गेल्या चार दशकांपासून आमदार असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या होम स्पीचवर पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे नवखे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव केला आहे. राज्यातील बऱ्या नेत्याचा पराभव करणारे खताळ या मतदारसंघात अखेर गेमचेंजर ठरले. थोरात यांचा पराभव संगमनेरकरांसाठीच नव्हे तर राज्यातील काँग्रेससाठी धक्कादाय ठरला असून गेल्या चार दशकानंतर प्रथमता विरोधकांना या मतदारसंघात मिळालेले यश थोरात यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारे आहे. येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा…
शनिवार 23 नोव्हेंबर – शिर्डी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 6332 मतांनी आघाडीवर आहेत. विखे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांनी तिसऱ्या फेरी अखेर 12886 तर विखे यांनी 19218 मते मिळविली आहे. तर बंडखोरी केलेल्या डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी तिसऱ्या फेरी अखेर 136 मते मिळाली होती. तर वंचित बहुजन आघाडीचे राजू शेख यांनी 146 मते मिळविली.
शुक्रवार, २२ नोव्हेंबर – अहिल्यानगर बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी लागत आहे. दरम्यान या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी पैशाचा वापर केल्याचे समोर येऊ लागले आहे. निवडणूक कामासाठी नेमलेल्या भरारी पथकांनी देखील कोट्यावधी रुपये, सोन्याचे दागिने पकडले असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बस मध्ये दुसऱ्या दिवशी प्रवाशांना बसच्या सीट खाली पाचशे रुपयांचे दोन नोटांचे बंडल आढळून आले. नोटांच्या मोजणीनंतर तब्बल ८६ हजाराची रोकड असल्याचे समोर आले असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव एसटी आगाराच्या कोपरगाव-वैजापूर-कोपरगाव आशा फेऱ्या मारणाऱ्या एसटी बसमध्ये सीटखाली प्रवाशाला पाचशे रुपयांच्या नोटांची दोन…
शुक्रवार २२ नोव्हेंबर – संगमनेर बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी उद्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी ८.०० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडासंकुल येथे होणार आहे. २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होत असून पारदर्शक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी “महाराष्ट्र संवाद न्यूज”ला दिली आहे. संगमनेर मतदार संघाचा निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहे. बुधवारी एकुण २८८ मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडली. मतदान प्रक्रियांमध्ये कोणताही अनुचित प्रकार समोर आला नाही. १४७ मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून वेबकास्टिंग करण्यात आले. यामुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणाऱ्या रांगा व मतदान केंद्रातील तसेच…
शुक्रवार, २२ नोव्हेंबर – ठाणे उल्हासनगर कॅम्प ५ मधील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या कचरा पट्टीतील झाडाझुडपात एका तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगवेगळी चार पोलीस पथके तयार करून तपास सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात राहत होती. १८ नोव्हेंबर रोजी मृत मुलगी…
शनिवार, २२ नोव्हेंबर – बीड बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती असलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकाने वर्षभरातच तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमविल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हरिभाऊ नारायण खाडे (रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे या दोघांवर अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी ही कारवाई केली असून लाच…
शुक्रवार, २२ नोव्हेंबर – पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर आज (२१ नोव्हेंबर) दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १० ची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १७ मार्च २०२५ रोजी संपेल. दहावीची परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. इयत्ता १२ वी सामान्य, बायफोकल आणि व्होकेशनल…
