Author: अनंत पांगारकर
बुधवार, २४ जुलै राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. या योजनेमुळे मेंढीपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि धनगर व तत्सम समाजाला आर्थिक बळकटी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०१७ साली सुरू झालेल्या या योजनेची फलश्रुती लक्षात घेता तिची व्याप्ती वाढवून अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा आणि भटक्या प्रवर्गातील समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी, या उद्देशाने पशुसंवर्धन मंत्री विखे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास काही बदलासह मंजुरी…
बुधवार, २४ जुलै डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रमा असून संगमनेर नगरपरिषद पोस्ट विभागाच्या जनकल्याणकारी योजना शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करेल. डाक विभागाची नाळ सामान्य माणसांपर्यंत जोडलेली असल्याने पोस्टाच्या फायदेशीर योजनांचा सर्वांनी लाभ घ्यायला हवा, असे आवाहन संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले. संगमनेर मुख्य डाकघर आणि संगमनेर नगरपालिका यांच्या विद्यमाने संगमनेरमध्ये प्रथमच डाक चौपाल या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात या डाक चौपाल या उपक्रमाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकीकर, सहायक अधीक्षक मुख्यालय संतोष…
बुधवार, २४ जुलै मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रंगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयाने हे अटक वॉरंट काढले आहे. २०१३ मध्ये जालना येथे ‘शंभुराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख असे तीस लाख रुपये नाट्य निर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. या प्रयोगांचे पूर्ण पैसे नाट्यनिर्मात्याला देण्यात आले नाहीत. प्रयोग आयोजित करून नाट्य निर्मात्याचे पैसे बुडविल्या प्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्या विरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.…
बुधवार,२४ जुलै राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांचा समावेश आहे. बदल्या करण्यात आलेले सर्व अधिकारी मुंबई, पुण्यातील आहेत. यांच्या झाल्या बदल्या… महिला व बाल अत्याचार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले सुहास वारके यांची मुंबईच्या नागरी हक्क संरक्षण विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या अश्वती दोरजे यांची महिला व बाल अत्याचार विभाग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले शशिकांत महावरकर यांची पिंपरी चिंचवडच्या पोलीस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलीस दळणवळण…
मंगळवार, २३ जुलै एकीकडे देशाचा अर्थसंकल्प मांडला जात असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे – “राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाख शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका भाडे तत्वावर अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी १६ हेक्टर…
संगमनेरला येऊ शकतो तर लोणीलाही जाऊ शकतो, दुग्ध विकास मंत्र्यांना इशारा मंगळवार, २३ जुलै दूध दरासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाब पॅटर्नचे अनुकरण करत शेकडो ट्रॅक्टर एकत्र करून आज जबरदस्त रॅली काढली. कोतुळ ते संगमनेर ५५ किलोमीटर अंतर पार करत ३०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर संगमनेर शहरात धडकले. रॅली प्रांताधिकारी कार्यालयावर धडकण्यापूर्वीच शासकीय विश्रामगहाजवळ अडविण्यात आली. त्यामुळे विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारामध्येच शेण ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे गेले १८ दिवस शेतकरी बेमुदत सत्याग्रहाला बसले…
विकसित भारत संकल्पनेला बळ पंतप्रधानांनी कोट्यावधी देशवासियांचा विश्वास ठरविला सार्थ ‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब मंगळवार, २३ जुलै कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. शेतकऱ्यांना बळ… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला…
मंगळवार, २३ जुलै काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना तब्बल १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे. थोरात म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातून सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले. याचबरोबर त्या काळात सातत्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. महसूल मंत्री आणि कृषिमंत्री म्हणून आमदार थोरात हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय राहिले राज्याचा व्याप सांभाळत असताना त्यांनी संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या असून या विकासातून संगमनेर तालुका मॉडेल ठरला आहे. याचबरोबर उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे…
मंगळवार, २३ जुलै पोलीस प्रशासना विरोधात विशेषत: वादग्रस्त ठरलेल्या एलसीबी विरोधात खासदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. दरम्यान आंदोलन करू नको म्हणून पाच कोटी रुपये आणि महिन्याला पॅकेज देतो अशी ऑफर आपल्याला देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करत आपण मॅनेज होणाऱ्यांपैकी नसल्याचे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे. लंके यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनामुळे अहमदनगर एलसीबी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाची पुरती नाचक्की झाली असून सामान्य माणसाच्या मनातून पोलीस दलाची प्रतिमा खालावली आहे. लंके यांच्या आंदोलनात नागरिकांच्या तक्रारीचा आणि त्यांना आलेल्या पोलीस दलाच्या वाईट अनुभवाचा अक्षरश: पाऊसच पडला आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक…
मंगळवार, २३ जुलै महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रविवारी रात्री तरुणाची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सोमवारी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमला होता. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरात महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हरून पटेल (वय २८ वर्षे, रा. आयशा कॉलनी, कोपरगाव) या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करत हत्या केल्याचा आरोप सोहेल पटेलच्या कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात मयत सोहेलचा भाऊ शाहरुख खान पटेल याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर…
