Author: अनंत पांगारकर
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघे ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कायदेक्षेत्र आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होते, मात्र त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. सोमवारी कामकाजासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. त्यानंतर तातडीने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे उत्तम आकलन, तसेच संविधानाचे सखोल ज्ञान…
हे राशीभविष्य सर्वसाधारण असून, प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार त्यात बदल होऊ शकतो. मेष (Aries)- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील. वृषभ (Taurus)- आज तुम्हाला संयम बाळगावा लागेल. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण तुमच्या मेहनतीने तुम्ही त्यावर मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. मिथुन (Gemini)- तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क (Cancer)- आज तुम्ही भावनिक होऊ शकता. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. वैयक्तिक संबंधात गोडवा राहील. सिंह (Leo)- आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन…
मुंबई – राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देत, एकत्रित ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’ अंतर्गत नवीन २,३९९ उपचारांचा समावेश करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय, पाच लाखांपेक्षा अधिक खर्च असलेल्या अवयव प्रत्यारोपणासारख्या गंभीर उपचारांसाठी वेगळा ‘कॉर्पस निधी’ (Corpus Fund) निर्माण करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नियामक परिषदेच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व महिला व…
अहिल्यानगर – जिल्ह्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच, धोका असलेल्या भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, विखे पाटील यांनी प्रशासनाला पूर्णपणे सतर्क राहण्यास सांगितले आहे. प्रशासनाने पाच आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांतील गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये पारनेर (३), पाथर्डी (३), श्रीगोंदा (८) आणि कर्जत (५) या तालुक्यांतील मंडळांचा…
अहिल्यानगर – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून…
नवी दिल्ली – देशभरातील फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, आता त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी लावता येणार आहे. आरोग्य सेवा महानिदेशालयाने (DGHS) या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश मागे घेतला आहे. हा निर्णय फिजियोथेरेपिस्ट्ससाठी एक मोठा विजय मानला जात आहे. यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी डीजीएचएसच्या संचालक डॉ. सुनीता शर्मा यांनी एक पत्र जारी केले होते. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, फिजियोथेरेपिस्ट्स त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरू शकत नाहीत. यामागचे कारण देताना त्यांनी म्हटले होते की, यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि बोगस डॉक्टरांच्या वाढीला चालना मिळू शकते. ‘डॉक्टर’ ही उपाधी फक्त…
संगमनेर – राज्याचे मुख्यमंत्री आणि नगर विकास विभागाच्या सचिवालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या जागेच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटणार असून, शहरातील जुनी आरक्षणे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. तांबे म्हणाले, यामुळे संगमनेर शहरातील इंदिरानगर, वकील कॉलनी, मालदाड रोड, पद्मनगर, अभंग मळा, स्टेडियम परिसर, गुंजाळ आखाडा यांसारख्या भागांतील हजारो कुटुंब आणि वसाहती या निर्णयामुळे कायदेशीर अडचणीतून बाहेर पडतील आणि त्यांना हव्या असलेल्या नागरी सुविधा मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. १९८० च्या शहर विकास आराखड्यानुसार, शहरातील काही भागांत शेतजमिनी होत्या. या जमिनींवर गार्डन, खेळाचे मैदान, शाळा अशा विविध कारणांसाठी आरक्षण टाकण्यात…
संगमनेर – सध्या काही कीर्तनकार राजकीय पक्षांचे जाहीर प्रचारक म्हणून काम करत असले, तरी पूर्वीही राजकीय पक्षांचा छुपा प्रचार अनेकदा झालेला आहे, असं मत ‘रिंगण’ मासिकाचे संपादक सचिन परब यांनी व्यक्त केलं. सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परब बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते. तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, भारत महाराज घोगरे गुरुजी, समाधान महाराज देशमुख आणि पत्रकार-कीर्तनकार शामसुंदर महाराज…
संगमनेर – जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. सध्या अहिल्यानगर व धुळे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेने देखील या संदर्भात कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आमदार तांबे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बदली प्रक्रिया पूर्ण…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ- आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन- आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होऊ शकतात. सामाजिक कार्यात भाग घेतल्यास मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क- कामात काही अडथळे येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या संयमाने आणि प्रयत्नांनी त्यावर मात कराल. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद…
