Author: अनंत पांगारकर
मेष (Aries) – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या कामात यश मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढलेली असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे आहे. कामात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही शांत राहून त्या सोडवू शकता. पैशांची गुंतवणूक करताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मिथुन (Gemini) – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने तुम्हाला आनंद होईल. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. कर्क (Cancer) – आज तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकता. कामाच्या ठिकाणी काही समस्या…
दूध संघाकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचेही संकेत संगमनेर – संगमनेर तालुक्याचा विकास शेतकरी व सहकाराच्या भक्कम पायावर उभा असून शेतकरी, उत्पादक हाच तालुक्याच्या विकासाचा पाया आहे. येथील सहकारामुळे आपली बाजारपेठ समृद्ध झाली असून, ती टिकवण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना थोरात यांनी, तालुक्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून तालुक्यात खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत आणि लोकांना रोज अटकपूर्व जामीन घ्यावा लागत आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, पण आता…
शिर्डीत अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास, हार-फुले-फोटो विकण्यास लावणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल; अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच मोठी कारवाई शिर्डी- शिर्डीत भीक मागणाऱ्या आणि विविध वस्तू विकणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली, यामध्ये १२ मुलांना बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. शिर्डी मंदिर परिसरात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमध्ये, भीक मागणे, हार, फुले आणि फोटो विकणे अशा कामांमध्ये गुंतलेल्या १२ मुलांची सुटका करण्यात आली. या मुलांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले होते. काही मुले नशेच्या आहारी जाऊन भाविकांना…
नवी दिल्ली – आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) फिजिओथेरपिस्टसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. डीजीएचएसने फिजिओथेरपिस्टना त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही पदवी लावण्यास मनाई केली आहे, कारण ते वैद्यकीय डॉक्टर नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. डीजीएचएसच्या डॉ. सुनिता शर्मा यांनी एका पत्राद्वारे सांगितले की, फिजिओथेरपिस्टनी ‘डॉक्टर’ ही पदवी वापरणे हे इंडियन मेडिकल डिग्री ऍक्ट १९१६ चे उल्लंघन आहे. हे पत्र त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांना पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, फिजिओथेरपिस्ट हे प्रशिक्षित वैद्यकीय डॉक्टर नाहीत. त्यामुळे त्यांनी ‘डॉक्टर’ ही पदवी वापरू नये. यामुळे रुग्ण आणि सामान्य नागरिकांची दिशाभूल होऊ शकते. डॉ. शर्मा…
दारू आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी: पोलिसांनी ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला; ४३ जणांविरोधात गुन्हे दाखल अहिल्यानगर – पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर एमआयडीसी, शेवगाव आणि जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ४३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी ही कारवाई केली. एमआयडीसी परिसरात पोलिसांनी अभिषेक खाडे (वय २५, रा. लोहगाव, ता. नेवासा) याला अटक केली. त्याच्याकडून ‘बिंगो’ नावाचा जुगार खेळण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण २३,०२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…
जाणून घ्या, आज शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ चे राशीभविष्य मेष राशी – आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आजचा दिवस आनंद आणि लाभाचा आहे. वृषभ राशी – तुमच्या विचारांमुळे आणि बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. व्यापारात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकता. मिथुन राशी – आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीत कामाचा भार वाढेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. कर्क राशी – आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादापासून दूर राहा. सिंह राशी – आज तुमचे मन आनंदी आणि…
संगमनेर – संगमनेरमध्ये बिबट्याचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसत आहे. संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे बिबट्याने एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केला असून, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आई, आजी आणि मामासोबत शेतात गेलेल्या श्रीधर नावाच्या मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, आई आणि आजीने मोठ्या हिमतीने आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्याला सोडून पळ काढला. सध्या मुलावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून, नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शेडगाव येथील…
विशेष प्रतिनिधी / मुंबई मराठा आंदोलनानंतर राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय हा सरसकट आरक्षण देणार नाही. तर पुरावा तपासूनच आरक्षण मिळणार असल्याचा मुख्यमंत्री पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयावर ओबीसी समाजाच्या नेत्यांचा आक्षेप आहे. याशिवाय ओबीसी नेत्यांकडून न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्पष्टीकरणाने मराठा समाजाचा आणि समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांचा पुरता हिरमोड झाला आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन शासन निर्णय काढला आहे, कोणालाही सरसकट आरक्षण हा शासन निर्णय…
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. लवकरच हा निधी सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होईल. गेल्या काही दिवसांपासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. सामाजिक न्याय विभागाकडून या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला…
मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या गुजरातचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल पद रिक्त झाले होते. राष्ट्रपती भवनाने गुरुवारी ही माहिती दिली. या संदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसोबतच महाराष्ट्राचा कार्यभारही सांभाळतील. कोण आहेत आचार्य देवव्रत? मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील आचार्य देवव्रत हे एक अनुभवी राजकारणी आहेत. २०१९ पासून ते गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून कार्यरत…
