Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी सकल धनगर समाजाच्या वतीने सुकेवाडी-खांजापूर गावात यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्साहात साजरी झाली असली तरी, यावर्षी जयंतीला 300 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गावातील तरुणांनी एकत्र येत एका वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमामागे समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना उत्सवात सहभागी करून घेण्याचा आणि त्यांना अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा उद्देश होता. यासाठी कोणत्याही प्रकारच्या डीजे किंवा साऊंड सिस्टीमवर खर्च न करता, राजकारण विरहित जयंती साजरी करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. जयंतीच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.…
पुणे – ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अखेर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेतील त्रुटींची कबुली दिली. “लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून, या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पवार यांनी यावेळी योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हानेही स्पष्ट केली. लाडकी बहीण योजना लागू केली, तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी नमूद केले. या योजनेसाठी मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज – बनावट वकील स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२) हिने एका महिलेकडून ५ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत स्नेहल कांबळेवर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यामुळे तिने केलेल्या आणखी फसवणुकीचे गुन्हे समोर येण्याची शक्यता वाढली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडली… स्नेहल कांबळेला यापूर्वी एका शेतकऱ्याकडून खंडणी स्वीकारताना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. तिच्या घराच्या झडतीमध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळली. यानंतर, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी नागरिकांना आवाहन केले होते की, ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयातील प्रतिभावान विद्यार्थी प्रज्वल दीपक साळुंके याची कॅरिबियन बेटांवरील सेंट किट्स अँड नेव्हिस येथे एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये तब्बल $180,000 (सुमारे ₹15 लाख) वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड झाली आहे. प्रज्वलने आपले उत्कृष्ट शैक्षणिक प्रदर्शन, प्रभावी नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर ही महत्त्वपूर्ण संधी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल बोलताना प्रज्वलने आपले श्रेय अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयाला दिले. तो म्हणाला, अमृतवाहिनी एम.बी.ए. मध्ये विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला जातो. महाविद्यालयात नियमितपणे विविध क्षेत्रांतील तज्ञांचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, मॉक इंटरव्ह्यू यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक…
राजकारणात कसंही वागलं तरी काहींना त्याचं काहीच वाटत नाही. निर्ढावलेले तर मी नाही त्यातली.. अशा प्रकारचा देखावा करतात आणि झालं गेलं, असं मानून चक्क खोटारडेपणा करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी उपरती झालेले अनेकजण आहेत. ज्यांनी सोबतीच्या साथीदारांना आपलं काम भागल्यानंतर वार्यावर सोडलं आणि पुन्हा तोंड वर करून स्वत:ला निर्दोष असल्याचा स्वत:च निवाडा दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोच मार्ग अवलंबलेला दिसतो आहे. सत्तेत चढ-उतार दिसू लागले की त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं अवमुल्यन झाल्याची स्वप्न पडतात. हे करायला परिस्थिती भाग पाडते, असं ते बेमालूम कबुलही करतात. सत्ता हवी असली की हातावर हात ठेवून थांबता येत नाही, म्हणून मग अवमुल्यन करावं लागतं असं…
पुणे – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत शनिवारी सायंकाळी एका मद्यधुंद कारचालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत १२ जणांना उडवले. या भीषण अपघातात जखमी झालेले सर्वजण MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही धक्कादायक घटना भावे हायस्कूलजवळ, श्री साईनाथ अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अनेक विद्यार्थी दिवसभर अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून चहा पिण्यासाठी भावे हायस्कूलजवळच्या चहाच्या टपरीवर थांबले होते. याचवेळी जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) नावाच्या चालकाने भरधाव वेगात आपली कार (पर्यटक टॅक्सी) चालवत आणली. प्राथमिक अंदाजानुसार, तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचा गाडीवरील ताबा…
संगमनेर – प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याची कन्या आणि महान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे मोठ्या उत्साहात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यादेवी होळकर यांना ‘देशातील आदर्श राज्यकर्त्या’ असे गौरवले. संगमनेरमधील आशीर्वाद पतसंस्थेसमोर आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरात म्हणाले की, अहिल्यादेवींचे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले. विशेषतः, पाण्याचे महत्त्व ओळखून जलव्यवस्थापनात त्यांनी मोठी क्रांती घडवली, ज्यामुळे त्या खऱ्या अर्थाने आदर्श राज्यकर्त्या ठरल्या. भारतीय इतिहासात ज्या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या, त्यात अहिल्यादेवींचा गौरव आदर्श राज्यकर्त्या म्हणून केला…
संगमनेर – प्रतिनिधी नाशिक परिक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विश्वास लक्ष्मण भान्सी यांची संगमनेर (अहिल्यानगर) येथून नंदुरबार येथे बदली झाली आहे. नाशिक परिक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळाच्या ३० मे २०२५ रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने परिक्षेत्रातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी यातील काहींना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. आदेशात बदली झालेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करताना पर्यायी अधिकाऱ्यांची वाट पाहू नये असेही म्हटले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी…
मुंबई, ३१ मे २०२५ – विशेष प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने शनिवारी संघटनात्मक बदल करत उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नावाची आज घोषणा केली. यापूर्वी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती त्या पाठोपाठ आता उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांच्या सहीने या संबंधित पत्र संबंधितांना देण्यात आले आहे. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व आले आहे. यापूर्वी घोषित न झालेल्या जिल्ह्यांसाठीच्या पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: कोकण: * पालघर: भरत राजपूत * वसई विरार: श्रीमती. प्रज्ञा पाटील उत्तर महाराष्ट्र: * अहिल्यानगर शहर: अनिल मोहिते * नाशिक शहर: सुनील केदार * नाशिक…
मुंबई – प्रतिनिधी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोळ समोर आला आहे. तब्बल २ हजार ६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करत आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले असून, त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या पडताळणी मोहिमेदरम्यान हा गैरप्रकार समोर आला. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सामान्य प्रशासन विभागाला १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिल्यावर पोर्टलवरील नोंदी तपासण्यात आल्या. या तपासणीत, सरकारी कर्मचारी असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ महिलांची नावे समोर आली. योजनेच्या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता…
