Author: अनंत पांगारकर
मुंबई: महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल सरकारने तातडीने सार्वजनिक करावा, अशी आग्रही मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि जाती अंत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानंतर १० एप्रिल रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन करून जनतेकडून ३० एप्रिलपर्यंत यावर आक्षेप आणि मते मागवण्यात आली होती. मात्र, ज्या अहवालावर मते द्यायची आहेत, तो मूळ अहवालच सरकारने अद्याप लोकांसमोर ठेवलेला नाही, याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे. या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित…
अहिल्यानगर: जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांवर सतत देखरेख ठेवली जात असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३४ गावे आणि १६२ वाड्या-वस्त्यांना ३० टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका संगमनेर, पारनेर आणि नगर तालुक्यांना बसला असून तेथे अनुक्रमे १०, १३ आणि ६ टँकर तैनात करण्यात आले आहेत. एकूण ६४ हजार ५८६ नागरिक या टँकर सुविधेवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने टँकरच्या खेपांचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे केले असून मंजूर ९०.९२ खेपांपैकी ८८ खेपा पूर्ण केल्या जात…
मुंबई: नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले आहे. पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून हा चाकणकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे संशयित व्यवहार आढळले आहेत. समता नागरी सहकारी पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांशी संबंधित सुमारे ३ ते ५० कोटी रुपयांची उलाढाल प्रतिभा चाकणकर यांच्या बँक खात्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, याच पतसंस्थेत…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहील, मात्र जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा. वृषभ: आज तुम्हाला भाग्याची खंबीर साथ मिळेल. प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यातून भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांतीसाठी वेळ काढा. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांशी संवाद साधताना वादाचे प्रसंग टाळा. गुंतवणूक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक भोंदू कॅप्टन अशोक खरात याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याला पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले. अवतार पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाला एक कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या अशोक खरातला न्यायालयाने चार मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. व्यवसाय जगभरात विस्तारण्याच्या इच्छेचा गैरफायदा घेत आरोपी खरातने एका व्यावसायिकाला १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात समोर आले. आहे. आरोपीने फिर्यादीला ‘अवतार पूजा’ करण्याचे आमिष दाखवून ईशान्येश्वर मंदिर परिसरात बोलावले आणि तिथे बनावट साप दाखवून मृत्यूची भीती घातली. ही पूजा पूर्ण करण्यासाठी २१ देशांत जावे लागेल, अन्यथा नागदंश होऊन मृत्यू होईल, अशी भीती…
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच केंद्र सरकारने सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे आपले क्रूर धोरण पुन्हा एकदा राबवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका संपताच महागाईचा भडका उडाला असून, १ मेपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे दुकानदार आणि रेस्टॉरंट चालकांचे कंबरडे मोडले असून, ऐन उन्हाळ्यात महागाईची ही झळ जनतेला सोसावी लागणार आहे. व्यावसायिक सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढीचा फटका आता सामान्य कुटुंबाच्या हॉटेल आतील खाद्यपदार्थांना बसणार आहे. नव्या दरवाढीनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता ३०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, पुणे: पुण्यातील चंदननगर भागात एका तरुणाने प्रेमप्रकरणातील वादातून २२ वर्षीय तरुणीचा ब्लेडने गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे असे जखमी तरुणीचे नाव असून, तिची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. याप्रकरणी तरुणीचा भाऊ भगतसिंग दोहरे याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते, मात्र अलीकडे त्यांच्यात खटके उडत होते. बुधवारी, २९ एप्रिल रोजी तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने पठारे वस्ती येथील…
मुंबई: राज्य सरकारने जून २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेचा टप्पा ३० एप्रिल रोजी पूर्ण झाला असून, आतापर्यंत राज्यातील १ कोटी ८९ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली शेवटची मुदत संपल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी एकूण २ कोटी ४३ लाख बहिणींनी नोंदणी केली होती, मात्र सखोल पडताळणीनंतर तब्बल ५४ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. योजनेच्या पारदर्शकतेसाठी गेल्या दीड वर्षांपासून विविध मार्गांनी निकषांची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, निकषात बसत नसतानाही काही महिलांनी लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः…
मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करत २१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमनाथ घार्गे यांची मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदी रवानगी झाली आहे, तर चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आता अहिल्यानगर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतील. या बदल्यांच्या सत्रात जालना येथून अजय के. बन्सल यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा पोलीस अधीक्षक पदी, अमरावती ग्रामीणचे सिगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक पदी आणि नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महाराष्ट्रात ‘दैवी शक्ती’ आणि ‘चमत्काराच्या’ नावाखाली सुरू असलेला अंधश्रद्धेचा बाजार पोलिसांनी उखडून टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमधील कुख्यात भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून, गेल्या ३० दिवसांत पोलिसांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण १४ भोंदू बाबांना गजाआड केले आहे. गजाआड केलेल्या या भोंदूंचे अनेक प्रताप पोलीस तपासात समोर येत आहे. या भोंदूनी महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिकच्या अशोक खरातवर आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने महिलांचे शोषण करण्यासाठी गुंगीकारक पदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली असून, सध्या SIT (विशेष तपास पथक) या प्रकरणाचा सखोल…
