Author: अनंत पांगारकर
महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा महोत्सव मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले असून बदलापूर घटनेनंतर पोलीस पीडीतेचा एफआयआरदेखील दाखल करून घेत नव्हते. दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत अशा परिस्थितीत भ्रष्टाचार देखील वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेला होता भ्रष्टाचाराच प्रतीक असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटल आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीत आयोजित ‘इंदिरा महोत्सव’ शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.…
ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ मंगळवार, दि. ३ सप्टेंबर मुंबई : ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा आयोजन मुंबई येथे मंगळवारी करण्यात आले होते. “विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण” अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई / संगमनेर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा मागण्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मान्य कराव्या, असा इशारा देत एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूरसह राज्याच्या अनेक भागातील कर्मचारी संपात उतरल्याने आता ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबलेली दिसत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी सोमवारी राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात आली, तर मंगळवारपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्यावतीने निदर्शने व द्वारसभा आयोजित करण्यात आली होती, त्याचवेळी सरकारला संपावर जाण्याचा…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगमनेरमधील वकील शरीफ पठाण आणि त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार घडला होता. हल्ल्याच्या घटनेपासून फरार असलेल्या आरोपींना संगमनेरच्या न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता औरंगाबाद खंडपीठातही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले आहे. ॲड. पठाण यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा ते मागे घेत नाहीत, या कारणावरून अशपाक इब्राहिम पटेल (रा. साकुर), सादिक रज्जाक शेख, आयाज रज्जाक शेख, आयान सादीक शेख, जुनेद सादीक शेख, कदीर नुरमोहम्मद उर्फ लतिफ शेख, इमरान बशीर शेख (सर्व रा. संगमनेर) यांनी वकील शरीफ शेख आणि त्यांच्या भावाला शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ कोयता, गज, दांडके, हॉकी स्टिकच्या…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी…
आजचे राशीभविष्य मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर २०२४ मेष – जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. आज कोणावरही विसंबून राहू नका. आळस करू नका. भाग्य तुमच्या पाठीशी आहे. वृषभ – आज अचानक धनलाभ संभवतो. शुभ दिवस परंतु अतिशय खर्चिक असा दिवस. आज शक्यतो प्रवास करू नका. मिथुन – संतती आज आपल्याला खुश ठेवेल. संध्याकाळ नंतर आर्थिक समस्या सुटतील. कर्क – आज घरी बसा, आराम करा. आनंदी दिवस. मध्यांनी मात्र मानसन्मानाची आणि होण्याची शक्यता. सिंह – प्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी. आजचा दिवस भाग्यशाली. आज जे मागाल ते मिळेल. कन्या – आईकडच्या नातलगाकडून, मामा कडून आर्थिक फायदा संभवतो. मान सन्मानात वाढ होईल. तुळ…
सोमवार, ०२ सप्टेंबर वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे रविवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणावेळी आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. यातून मुस्लिम समाजाच्या भावना देखील मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या आहेत. नितेश राणेंनी मुस्लिम समुदाय विषय केलेले वक्तव्य त्यांना भोवले असून सामाजिक कार्यकर्ते आसिफ चांदसाहब शेख त्यांच्या तक्रारीवरून नगरच्या तोफखाना पोलीस…
गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ सोमवार, दि. २ सप्टेंबर पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली असून रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान आंदेकर यांचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आंदेकर यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचा देखील तपास केला जात असून या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते.…
जाणून घ्या… आजचे राशीभविष्य सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४ मेष – आज भाग्येश शनी कर्म स्थानात असल्याने बऱ्याच दिवसानंतर अडकलेली कामे मार्गे लागतील. आर्थिक समस्या दूर होतील. जोडीदाराबरोबर सहलीचा आनंद घ्याल. वृषभ – व्ययेश मंगळ धनस्थानी असल्याने अचानक प्रवासाचे योग. अचानक खर्च वाढतील. ओळखीचा कोणालाही फायदा घेऊ देऊ नका. मिथुन – जन्मस्थानी असलेल्या मंगळामुळे आज तुमच्या स्वभावातील शांतता भंग पावेल. कर्क – अचानक धनलाभाचे योग येतील. आज जोडीदार तुम्हाला समजून घेईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक समस्या दूर होतील. सिंह – जन्मस्थानी असलेल्या सूर्य चंद्रामुळे नोकरीच्या ठिकाणी प्रकर्षाने आपला प्रभाव जाणवेल. अडकलेली कामे पूर्णत्वास न्याल. कन्या – आर्थिक फसवणूक होऊ…
निळवंडे धरण, कालवे नक्की कोणी केले हे जनतेला माहिती सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सभा उत्साहात रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम केले, मात्र ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता फोटो काढत आहे. मात्र वस्तुस्थिती तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. भेदभाव निर्माण करत चांगल्या वातावरणात काही लोक विष कालविण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करत दहशत निर्माण करत आहे. मात्र अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांचा पुढील काळात बंदोबस्त करू, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विरोधकांना फटकारले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…
