Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची चांगलीच झाडाझडती घेतली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपला कारभार सुधारण्यासाठी त्यांनी महिनाभराचा अवधी दिला आहे त्यानंतर मात्र अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामासंदर्भातील आढावा बैठक झाली. यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आदींसह पदाधिकारी उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क “नफरत छोडो, भारत जोडो”चा नारा लहान-थोरांमध्ये आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. गावामध्ये दुतर्फा उभ्या असलेल्या गर्दीला भारत यात्री साद घालताच त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यावरुन ही यात्रा घराघरात पोहचल्याचे दिसत होते. वडशिंगी (जिल्हा बुलढाणा) मध्ये हे चित्र पाहायला मिळाले. हजारो आदिवासी आपल्या मागण्या घेऊन यात्रेत पुढे चालत होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील आदिवासी सांगत होते की, वडिलोपार्जित कसलेल्या जमिनींची मालकी मिळावी, सातबारा नावावर करून मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यासोबत शिक्षण, आरोग्य सारख्या मूलभूत सोयी मिळाव्यात या मागण्या घेऊन हजारो आदिवासी महिला पुरुष यात्रेत सहभागी झाले होते. लाल, भगव्या, साड्या, डोक्यावर पदर तर पुरुषांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रबोधनकार म्हणजेच केशव सिताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे नातू म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. याशिवाय आज ‘प्रबोधनकार डॉट कॉम’या संकेतस्थळाचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे. प्रबोधनकारांच्या संकेतस्थळाचे निमित्ताने हे दोन्ही नेते आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. सायंकाळी साडेसात वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात संकेतस्थळाचा लोकार्पण कार्यक्रम होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रबोधनकार पोहोचवावे या उद्देशाने ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, १७ सप्टेंबर २०१० रोजी प्रबोधनकारांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धींगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सदृढ महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांनी दृरदृष्यप्रणालीद्वारे केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महापौर रोहीणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार स्नेहलता…

Read More

रविवार विशेष : प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगर या वृत्तपत्राचे माजी निवासी संपादक आहेत) विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची एकूणच पध्दत ही बदला घेणारी असल्याचं त्यांच्याच तोंडून स्पष्ट झालं. आता ते केवळ कपटी नाहीत. तर आपल्याला अपेक्षित असलेलं साध्य होत नसेल तर ते बदला घेऊ शकतात हे लक्षात घेतलेलं बरं. सत्तेसाठी कोणत्याही थराला माणूस जाऊ शकतो, यासाठी आवश्यक असलेली कुठलीही गोष्ट करायला तो मागेपुढे पाहत नाही हे फडणवीसांच्या कबुलीवरून आता स्पष्ट झालं. आजवर असं करणारे वृत्तीने गुंड, पुंड असायचे. आता त्याची काही आवश्यकता नाही. आता हुशार, चाणाक्ष, बुध्दीमानही या मार्गाचा वापर करू शकतो, हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन बांधलेल्या नगरमधील ३ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी उड्डाणपूलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, महापौर रोहीणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखेपाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, आमदार संग्राम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सर्वसामान्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मागणीनूसार निधी दिला जातो. या निधीचा विनीयोग करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे तसेच चालु आर्थिक वर्षात मंजूर असलेल्या निधीचे प्रस्ताव महिनाभराच्या आत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पून्हा एकदा वादग्रस्त विधान करत वाद ओढावून घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. केवळ एवढ्यावर थांबतील तर ते राज्यपाल कसले, त्यांनी त्याही पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे सांगत, ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है,’ असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याने राज्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रात जीवन कौशल्य संदर्भाने अमलबजावण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहेत त्या संदर्भात देशातील विविध राज्य सरकार व सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू असणाऱ्या प्रयत्नांच्या संदर्भाने दिल्ली येथे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्या चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी संदीप वाकचोरे यांची निवड करण्यात आली आहे. देशभरामध्ये सध्याच्या परिस्थितीत शालेय शिक्षणामध्ये जीवन कौशल्य समाविष्ट आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्या संदर्भातील गरजा, परिणामकारकता, अभ्यासने यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. त्यासाठी देशातील विविध उपक्रमा संदर्भात एकत्रित परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्य सरकार व देशातील 18 हून अधिक जीवन कौशल्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्यावतीने चर्चास्तराचे आयोजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क थोर समाजसुधारक आणि संतांनी दिलेल्या समतेचा विचार हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या रूपात आपल्या सर्वांना दिला आहे. मात्र सध्या लोकशाहीचे काही स्तंभ डळमळीत होत असून पुन्हा एकदा लोकशाही व समतेचा विचार अधिक बळकट करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक व राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. शेगाव येथील भारत जोडो यात्रेच्या विराट सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार राहुल गांधी, प्रभारी एच. के. पाटील, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंह, खा.…

Read More