Author: अनंत पांगारकर
शनिवार, ०३ ऑगस्ट संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील अत्याचार, धर्मांतर प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत शनिवारी न्यायालयाने तिसऱ्यांदा ५ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत. फिर्यादी अल्पवयीन असताना देखील आरोपींनी तिला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तिला फसवून मंचर येथे नेत अटकेतील आरोपी युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना लग्नासाठी मंचरवरून चाकण येथे नेले. त्यानंतर तेथून दुसऱ्या गाडीतून मुंबई येथे पाठवून दिले होते. मुंबईत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच तिचे धर्मांतर देखील…
शनिवार, ०३ ऑगस्ट संगमनेरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या माध्यमातून अनेक जण गुन्हेगारीकडे वळत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढीस लागल्याने हे धंदे बंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी दिला आहे. संगमनेर शहराच्या अनेक भागात गल्लोगल्ली मटक्याची दुकाने थाटली गेली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचा रस्त्यावर आता नागरिकांना देखील त्रास होऊ लागला आहे. बहुचर्चित ठरलेल्या शक्तिमान टॉवर्समध्ये देखील अनेक अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी आपले दुकाने सुरू केले असून पोलीस यंत्रणाच्या नजरेसमोर हे सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, गांजाची सिगारेट, उत्तेजक औषधी…
शनिवार, ०३ ऑगस्ट काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून यातून रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती सहकार महर्षी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. आमदार थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर मूलभूत गरजांची पूर्तता करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. यातून तालुक्यात अनेक विकास काम मार्गी लागले आहे. थोरात यांचे सुसंस्कृत नेतृत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका व केलेल्या विकास कामांच्या बळावर संगमनेर तालुका राज्य पातळीवर ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. या रस्त्यांचे होणार काम… कासारा दुमाला ते सावंत वस्ती रस्ता मजबुतीकरण…
शनिवार, ०३ ऑगस्ट | अनंत पांगारकर संगमनेर मधील बहुचर्चित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये समावेश असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर जामीन मंजूर केला आहे. कपाटे यांना जामीन मंजूर झाल्याने ठेविदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अपिलामध्ये जाणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय आसामी भाऊसाहेब कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे ८१ कोटी रुपयांचा कागदोपत्री घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याचा मुख्य ठपका चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह…
विशेष लेख… ३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अवयव दान दिवस साजरा केला जातो. याच दिवशी देशातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचे आठवण म्हणून २०१० पासून हा दिवस राष्ट्रीय अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जातो. एखाद्याला नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करने हा एक उदात्य मार्ग असु शकतो. अवयवदान दिनानिमित्त आपण जागरूकता वाढवूया आणि अधिकाधिक लोकांना अवयवदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करूया एका अवयवदात्यामुळे आठ पेक्षा अधिक लोकांना याचा उपयोग होतो. अवयवदानाच्या माध्यमातून आपले मौल्यवान अवयव दान करण्याचा संकल्प करण्याची आणि पुढे येण्याची संधी आपल्या सर्वांना आहे. अवयवदान जागृती वाढल्याने अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळू शकते, अवयवदानाचे…
मुंबई | प्रवीण पुरो करातून येणारा पैसा फुकट वाटण्यासाठी नाही, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबविण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार असून याप्रकरणी काय निकाल येतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १४ ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. मात्र ही योजना भ्रष्ट कृती असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.…
शनिवार, ०३ ऑगस्ट विशेष प्रतिनिधी | मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे नियोजनही सूरू आहे. असे असताना आता ”महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत, असे विधान करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब शिर्डीत साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा करणार असल्याचा प्रश्न केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कॉग्रेसची चांगलीच कान उघडणी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघे एकत्र आलो. विशेष…
जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा: डॉ. तांबे दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या: प्रभावती घोगरे हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ: डॉ. पिपाडा शुक्रवार, ०२ ऑगस्ट आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल अथवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर त्याचे पद घालविण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही. आता या उलट परिस्थिती असून विरोधी सरपंच आहे, म्हणून पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष नेऊन ठेवले आहे. पाणी योजना बंद पाडली जाते. मात्र माणसाला प्यायला पाणी देण्याच्या योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाही, जिरवाजिरवी आणि…
शुक्रवार, ०२ जुलै दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर शुक्रवारी रात्री संगमनेर पोलिसांनी बेकायदा चालविल्या जात असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरातून कत्तलीसाठी निर्दयतेने अन्नपाण्यावाचून डांबून, बांधून ठेवलेल्या डझनभरापेक्षा अधिक जिवंत जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेमध्ये दाखल केले. वेळेत पोलीस पोचले नसते तर या जनावरांची देखील कत्तल अटळ होती. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू या अवैध धंद्याला संगमनेर पोलिसांसह नगर पोलिसांचे आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कारवाया होत नसल्याच्या चर्चा सातत्याने होत या संदर्भात ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने देखील वृत्तमालिका सुरू ठेवत सातत्याने यावर प्रकाश टाकला आहे. या अवैध धंद्याचाच एक भाग असलेले संगमनेरमधील बेकायदा कत्तलखाने वारंवार टाकलेल्या छाप्यानंतर देखील सुरूच आहे. त्यामुळे…
शुक्रवार, ०२ ऑगस्ट संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाल्याबाबतचे वृत्त शुक्रवारी सकाळी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध होताच काही वेळातच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांचे आभार मानले आहे. महाराष्ट्र संवाद न्यूजने सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीची लिंक… https://maharashtrasanvadnews.com/?p=16569 देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांच्या नावाने बांधलेल्या या वास्तूचे दुरवस्था झाल्याने या संदर्भात ॲड. सैफुद्दीन शेख यांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना पत्र देत त्यांचे लक्ष वेधले होते. तसेच या संदर्भातील…
