Author: अनंत पांगारकर
साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्यावी, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश शुक्रवार. २६ जुलै : पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकतानगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरामध्ये चिखल शिरला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून…
शुक्रवार, २६ जुलै तीन अंगणवाड्यांच्या बांधकामाचे पैसे ठेकेदाराला काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून २६ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबारच्या अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे व सहाय्यक लेखा अधिकारी रवींद्र लाडे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले असून या दोघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा व ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र लाडे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम त्यांनी ग्रामपंचायतीच्या…
शुक्रवार, २६ जुलै दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल. दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी व्ही. रमणी पॅटर्न राबविणे तसेच राज्यातील दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी आयोजित संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम, माजी आमदार…
प्रवीण पुरो | मुंबई गुरुवारी (ता. २५ जुलै) पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगराला पावसाने झोडपून काढले असताना हवामान विभागानेही धडकी भरणारी शक्यता वर्तवली आहे. २६ जुलैची आठवण करून देणारा पाऊस आज होत आहे. शुक्रवारी (ता. २६ जुलै) सकाळपर्यंत मुंबईला पावसाचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराच्याबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ ला आलेल्या पुराची आठवण ताजी होऊ लागली आहे. या दिवशी मुंबईकरांनी पावसाचे रौद्ररुप पाहिले होते. त्या दिवशी मुंबईत दुपारपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. तेव्हा संपूर्ण मुंबईसह रायगड, ठाणे, रत्नागिरी जलमय…
गुरुवार, २५ जुलै ५५ वर्षीय आजोबासह तीन वर्षीय नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात पिंपळमळा येथे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संगमनेरमध्ये सातत्याने शेततळ्यात बुडून मृत्यूच्या वेदनादायक घटना समोर येत आहे. शिवाजी आत्याबा सोनवणे व समर्थ नितीन सोनवणे असे शेतात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या आजोबा-नातवाचे नाव आहे. गुरुवारी दुपारच्या वेळी शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील शेततळ्यालगत औषध फवारणी करत होते. याच दरम्यान त्यांच्या घरी पाहुणे आले म्हणून त्यांचा तीन वर्षाचा नातू समर्थ हा त्यांना बोलाविण्यासाठी शेततळ्याजवळ आला होता. तेथे खेळता खेळता तो शेततळ्यात पडला. पाठोपाठ त्याला वाचविण्यासाठी आजोबा शिवाजी सोनवणे यांनीही पाण्याने पूर्ण भरलेल्या…
गुरुवार, २५ जुलै अहमदनगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) भ्रष्टाचाराविरोधात कारवाईच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या खासदार निलेश लंके यांच्या उपोषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी यशस्वी मध्यस्थी घडवून आणली. त्यामुळे चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे. लंके यांनी एलसीबी विरोधात आवाज उठविल्याने नगर पोलिसांचे विविध कारनामे समोर आले होते. एलसीबीतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारवाईवर तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या खासदार निलेश लंके यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एलसीबीच्या भ्रष्ट कारभाराचे रेटकार्डच जाहीर करत महिन्याकाठी तब्बल ३० कोटी रुपयांची बेकायदा वसुली करणाऱ्या या शाखेच्या इज्जतीचा पुरता पंचनामा जिल्ह्यात झाला होता. चार…
गुरुवार, २५ जुलै नागरिकांना मूलभूत गरजांची पूर्तता करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य काम आहे. मात्र शहरालगत असलेल्या घुलेवाडीतील कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नवश्याचा मळा येथील ग्रामस्थांना वेगळाच अनुभव येत असून मूलभूत गरजांसाठी त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. या भागातील नागरिक केल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामपंचायतीकडे रस्ता पाणी आणि वीज या संदर्भात पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत या नागरिकांकडून आवश्यक कर घेत असली तरी त्यांना सुविधा देण्यास मात्र असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ग्रामपंचायत प्रशासनाला शेवटचा इशारा देत एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत जर ग्रामपंचायतीने काम हाती घेतले नाही तर संघर्ष सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन उभे…
गुरुवार, २५ जुलै नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे रविवारी (२८ जुलै) शपथ देणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
गुरुवार, २५ जुलै विवाहित महिलेचा विनयभंग करणे चांगलेच अंगलट आले आहे. संगमनेरच्या न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल संभाजी साबळे (रा. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून २००९ मध्ये आरोपी अनिल साबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी तपास करत संगमनेर न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्राची पालवे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात सरकारी वकील राहुल शेळके यांनी पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर…
हप्तेखोर एलसीबी दरमहा करतेय २७ कोटी ६० लाखाची हप्ते वसुली! दोन टक्के हप्तेखोरांमुळे जिल्हा पोलीस दलाची नाचक्की, जिल्हा पोलीस प्रमुख गप्प का? गुरुवार, २५ जुलै जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात विशेषत: अहमदनगर एलसीबीच्या हप्तेखोरी विरोधात उपोषणास बसलेल्या खासदार निलेश लंके यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नगरचे पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्याचे रेटकार्डच जाहीर केले. नगर एलसीबीकडून तब्बल २७ कोटी ६० लाख रुपयांचे हप्ते दरमहा गोळा केले जात असल्याची धक्कादायक माहिती खासदार लंके यांनी दिली. खासदार लंके यांनी दिलेली माहिती कोणत्याही सामान्य नागरिकाचे डोळे पांढरे होतील अशी धक्कादायक आहे. कोणत्या व्यवसायातून किती रुपयांच्या हप्ते नगरच्या वादग्रस्त एलसीबीकडून गोळा केले जातात याची सविस्तर…
