Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्याचे लक्ष लागलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीचा भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले उल्हासदादा पवार यांना, तर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास, सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी. एन. पाटील यांना जाहीर करण्यात आला. येत्या रविवारी (ता. ७ जानेवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार…
टी-२० क्रिकेट स्पर्धा दर्शकांसाठी मेजवानी: आमदार सत्यजित तांबे राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह धुमधडाक्यात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संगमनेरमधील सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेत असलेला राज्य, देश पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रिकेट प्रेमींची उपस्थिती, उत्कृष्ट मैदान आणि दर्जेदार आयोजन यामुळे ही क्रिकेट स्पर्धा राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने आयोजित २४ व्या सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा थोरात यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी आणली आहे. काश्मीमधील फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला (Tehreek-E-Hurriyat) दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारकडून काश्मिरी फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यातूनच या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करत त्यावर बंदी घातली होती. त्या पाठोपाठ आता ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. ‘तेहरीक-ए-हुर्रियत’ला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले. दहशतवादाविरोधात…
महाराष्ट्र संवाद न्यूज मी अंथरुणातून उठलो, तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं, तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता. मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, “माझ्या छातीमध्ये आज, रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखतं आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो.” “हो, पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा.” मोबाईलमध्ये बघता-बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती. मी ॲक्टिव्हाची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि ॲक्टिव्हा स्टार्ट होत नव्हती. त्याचवेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रवीण पुरो @ ९८६९९९१८६८ सचित्र अभिनेता नाना पाटेकर सध्या बराच मोकळा आहे. कलेतली आपली आदाकारी सादर करता करता तो आता देशाच्या भवितव्याविषयीच्या गप्पा मारण्यासाठी मोकळा आहे. गेल्या आठवड्यात त्याने देशाच्या राजवटीविषयी टिपण्णी केली आणि २०२४ च्या निवडणुकीतही भाजपच बाजी मारेल, अशी भविष्यवाणी त्याने सांगून टाकली. तेव्हा खर्या नानाचे हे बोल नाहीत, असं सहज वाटून गेलं. थेट आणि भडक स्वभावाचा हा अभिनेता विद्यमान सत्तेविषयी खरं बोलत नाही, हे पाहून देश वासीयांनाच नानाचा मत्सर येईल. इंडिया टुडेच्या राहुल कनवल याला दिलेल्या मुलाखतीत आगामीतेच हे भविष्य त्याने वर्तवलंय. ही भविष्यवाणी सांगण्यासाठी नानाने बापुडे शब्द वाया घालवण्याची खर तर काहीही आवश्यकता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या तीन फौजदारी कायद्यांची जागा आता लवकरच नवीन कायदे घेणार आहेत, यात भारतीय दंड संहिता १८६० च्या जागेवर भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या जागेवर भारतीय साक्ष अधिनियम २०२३ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या जागेवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ हे तीन कायदे लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाले आहेत. तसेच नुकतीच या तिन्ही बिलांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने या कायद्यांचा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केलेले असून जुन्या भारतीय दंड संहितेतील ५११ कलमांच्या ऐवजी नवीन भारतीय न्याय संहितामध्ये ३५६ कलम आहेत, तर फौजदारी प्रक्रिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज अयोध्या : एक काळ असा होता की राम लल्ला तंबूत होते, आता फक्त रामलल्लालाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे. ‘देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख अत्यंत ऐतिहासिक ठरली आहे. या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आज स्वातंत्र्य चळवळीशी निगडित अशा एका शुभदिनी आपण स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला आज अयोध्या नगरीतून नवी ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. सरत्या वर्षात निरोप देताना अथवा नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतांनाच रस्त्यावर वाहन चालविताना स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास नुकसान पोहोचणार नाही याची खबरदारी न घेणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती संगमनेर-अकोलेचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. संगमनेर उपविभागाअंतर्गत संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले आणि राजुर पोलीस स्टेशनचा समावेश होतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्षभरात १३२ प्राणांकित अपघात झाले असून त्यात १३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील बहुतांशी वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालविल्याचे तसेच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ‘आम्ही पोलीस आहोत, पुढे लुटमार सुरू आहे. तुम्ही तुमच्या हातातील अंगठ्या काढून खिशात ठेवून द्या’, असे सांगत दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाच्या हातातील अडीच तोळ्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर संतू सोनवणे असे फसवणूक झालेल्या ६७ वर्षीय वृद्धाचे नाव असून ते भुसे ता. निफाड येथील रहिवासी आहेत. ते काही कामानिमित्त शनिवारी सिन्नरला आले होते यावेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिर्डी मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांसमोरून जात असताना लुटमारीची ही घटना घडली. दोघा भामट्यांनी त्यांना रस्त्यात थांबवून ‘आम्ही पोलिस असून, पुढे लुटमार सुरू आहे. तुम्ही तुमच्या अंगठ्या खिशात ठेवून द्या’, असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्नर (पुणे) : खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाऱ्या वकीलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २९) गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शिवम गजानन नायकोडी असे लाच लुचपत विभागाने अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असलेल्या तक्रारदाराच्या मुलाला जुन्नर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. नायकोडी तक्रारदारांचे खासगी वकील होते. त्यांनी मुलाला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपये, स्वतःची वकील फी १० हजार रुपये द्यावे लागतील असे…
