Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण ताजं असताना, त्याबद्दल रामभक्तांमध्ये संताप असताना आता श्रीरामाच्या नावानं झालेला एक गंभीर घोटाळा समोर आला आहे. बीएड आणि शिक्षक प्रशिक्षण कॉलेजांचं कागदांवरील साम्राज्य उघडकीस आलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अनेक कॉलेज शेतांमध्ये, ओसाड जागांवर नोंदणीकृत आहेत. तिथे गेल्यावर दिसणारी परिस्थिती वेगळीच आहे. काही कॉलेज लहान शाळांच्या परिसरांमध्ये भरत आहेत. काही ठिकाणी तर एकाच पत्त्यावर तीन-तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष पडताळणीत अनेक त्रुटी आणि गायब पत्ते सापडल्यानंतरही बरकतउल्ला विद्यापीठाने केवळ एका नोटरी शपथपत्राच्या आधारावर १२५ खासगी बीएड कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवला आहे. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अहिल्यानगर शहरातून संगमनेर तालुक्यातील ‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीमधील बी-१ आणि बी-२ या गाळ्यांमध्ये एका वाईन शॉपचे स्थलांतर प्रस्तावित आहे. मात्र, या स्थलांतरामुळे परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि स्थानिक व्यवसायांवर विपरीत परिणाम होणार असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येत आमदार अमोल खताळ यांना देखील विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे. या निवेदनावर विनीत देवेंद्र मेहता, कल्पेश चिमनलाल मेहता, भीमाशंकर रावबा चकोर, सिद्धार्थ ओझा, हर्षवर्धन खुळे यांच्यासह प्रमुख व्यावसायिकांच्या सह्या आहेत. या हरकतीमध्ये स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. अहिल्यानगरहून संगमनेर तालुक्यात वाईन शॉप स्थलांतरित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, संगमनेर तालुक्यात नव्या दमाच्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नव्या निवडीमध्ये काही पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. या नव्या निवडीनुसार संगमनेर तालुकाप्रमुखपदी अमर कतारी आणि भीमाशंकर पावसे, संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ३२ गावांसाठी तालुकाप्रमुख म्हणून प्रकाश गायकवाड यांचीदेखील तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून ग्रामीण भागासाठी सदाशिव हासे तर शहरी भागासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : माणसाला आयुष्याच्या प्रवासाने भाकरीची खरी किंमत शिकवली आहे. त्याच भाकरीच्या भुकेने निर्माण झालेल्या समृद्ध साहित्यातून सामान्य माणसाच्या जगण्याच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे टिपल्या गेल्या आहेत. त्यामुळेच नारायण सुर्वे यांच्यासारख्या थोर कवीचे साहित्य माणसाला संकटांशी लढण्याची, जगण्याची हिंमत आणि नवी शक्ती देते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनी केले. संगमनेर येथील साहित्य कला व सांस्कृतिक संघ आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य जत्रा’ कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या साहित्य सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने मुळा नदीपात्रात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठाबाई विकास घुले असे मृत महिलेचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे पठार भागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई या घरच्यांना शेतात जात असल्याचे सांगून निघाल्या होत्या, मात्र त्या दीर्घकाळ परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला घारगाव पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. शोध सुरू असताना टेकडवाडी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येठेवाडी गावाच्या शिवारातून अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या एका लाल रंगाच्या टाटा डंपरवर पोलिसांनी छापा टाकून चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १० लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. येठेवाडी गावाच्या शिवारातून एक लाल रंगाचा टाटा कंपनीचा डंपर (क्रमांक MH 20 DT 0239) बेकायदेशीररीत्या वाळू भरून १९ मैल मार्गे घारगावच्या दिशेने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर संकट, अपुरा पाऊस, वाढलेली उष्णता आणि दुष्काळाच्या दाहकतेवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे ही आता प्रत्येकाची नैतिक जबाबदारी बनली आहे. या पार्श्वभूमीवर, चालू वर्षी दंडकारण्य अभियानांतर्गत सर्वांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे अत्यंत जबाबदारीने संगोपन करावे. वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करणे हीच खरी मानवतेची आणि ईश्वराची सर्वोत्तम सेवा ठरेल, असे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दंडकारण्य अभियानाच्या विशेष नियोजन बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, प्रकल्प प्रमुख…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आणि धनलाभ घडवून आणणारा ठरेल. गजकेसरी योगामुळे कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, मात्र कोणाशीही बोलताना कठोर शब्दांचा वापर करणे टाळावे. वृषभ- आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन हितसंबंध जोडले जातील, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. नवीन गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घेताना घाई गडबड करू नका, अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मिथुन- आज मनात कोणताही संभ्रम न ठेवता कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि घरातील जुन्या समस्या दूर होतील. तब्येतीची थोडी काळजी घ्या आणि…
पुणे: सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्याजवळ टोलनाक्याजवळ दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी येथे मुक्कामी आल्यानंतर हा अपघात घडला. नांदेड जिल्ह्यातील एका दिंडीच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या वारकरी महिलांना धडक दिली. या अपघातात सांगली जिल्ह्यातील नंदा पवार, माधवी सलगरे आणि राजश्री भोसले या तीन महिलांचा मृत्यू झाला, तर अन्य जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. चालू खरीप हंगामात सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी या योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसाधारण पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के…
