Author: अनंत पांगारकर
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता, तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली असून १५ भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षांची जबाबदारी…
निवडणूक विश्लेषण | अनंत पांगारकर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपेक्षेप्रमाणे राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर यश मिळविले आहे. थोराताना शह देण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या नाकातोंडात पाणी गेले. थोरात यांच्या सैन्याने सेनापतीविना असलेल्या विखेंच्या सगळ्याच सोंगट्या मारल्या. शेतकरी मंडळाला एकही जागा मिळून न देणाऱ्या बुद्धिबळाच्या निवडणुकीत थोरात अखेर बाजीगर ठरले. बिनविरोध निवडीची परंपरा मोडीत काढत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनसेवा मंडळाचे उमेदवारी करत निवडणुकीत रंगत आणली होती. सर्वच्या सर्व…
महाराष्ट्र संवाद ◇ रविवार विशेष लेख कोणतीही सत्ता असो ती माणसाला अहंकारी बनवत असते. सत्ता डोक्यात भिनली की ती कोणालाच जुमानत नाही. मोदींच्या नेतृत्वातील मध्यवर्ती सरकारचं सध्या असंच काहीसं सुरू आहे. अहंकाराने सत्ताधारी इतके मदमस्त झालेत की आसपास काय बोललं जातं याचीही तमा ते करत नाहीत. असंख्य आरोपांची राळ उठली असतानाही त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. साधेसुधे आरोप झाले असते तर एकवेळ ते दुर्लक्षित करता आले असते. पण देशाच्या सार्वभौमत्वाला हात घालणारे आरोप होऊनही जेव्हा सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा त्यांना अहंकाराने पछाडल्याचाच प्रत्यय असतो. केंद्रातल्या मोदी सरकारचा कारभार अशाच अहंकारात सुरू आहे. असंख्य आरोप जे देशाच्या अस्तित्वालाच हात घालणारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मित्राचा खून केल्याच्या कारणावरून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम 304 (पार्ट सेकंड) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडासह दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शंकर लहानू साळुंखे, रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 3 फेब्रुवारी 2022 रोजी देवठाण रोड अकोले येथे खुनाची घटना घडली होती. सुतार व्यवसाय करणाऱ्या सरबजीत ओमप्रकाश चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणी राजू जगधारी राजभर याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी शंकर लहानु साळुंखे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक माहिती अशी, 3…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले आहे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाचा साफ धुव्वा उडाला आहे. त्यांच्या अधिपत्याखालील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. एका जागेवर थोरात समर्थक अपक्ष उमेदवाराचा व शेतकरी विकास मंडळाचे सतरा उमेदवार विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणूक मैदानामध्ये थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ आणि विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळात सरळ लढत झाली. शुक्रवारी मतपेटीत 45 उमेदवारांचे भवितव्य बंद झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून सोसायटी गटाच्या जागांची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाचे शंकर खेमनर, कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्हेरे, गीताराम गायकवाड, सतीश खताळ व विजय सातपुते विजयी झाले आहेत. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाने संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ यामुळे 17 वर गेले असून अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार देखील थोरात समर्थक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांना चंचू प्रवेशही करता आलेला नाही. सोसायटी मतदार संघ…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून महिला राखीव गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दिपाली वरपे आणि रुक्मिणी साकोरे या दोन्ही महिला उमेदवारांनी विजय मिळविला आहे. त्यांनी जनसेवा मंडळाच्या अंजना दिघे आणि रोहिणी निघते यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 8 वरून 10 वर गेले आहे तर थोरात समर्थक असलेले अपक्ष सचिन करपे देखील निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही. सोसायटी मतदार संघ महिला राखीव:- अंजनाबाई पुंजा…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून इतर मागासवर्गीय व सोसायटी विमुक्त जाती भटक्या जमाती या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. सुधाकर ताजने आणि अनिल घुगे यांचा विजयी उमेदवारात समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या शरद गोर्डे आणि संदीप घुगे यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 6 वरून 8 वर गेले आहे तर अपक्ष सचिन करपे निवडून आले. राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही खाते खोलता आलेले नाही. सोसायटी…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून ग्रामपंचायत सर्वसाधारण या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून शेतकरी विकास मंडळाच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळविला आहे. अरुण वाघ आणि सखाहरी शरमाळे यांचा विजयी उमेदवारास समावेश असून त्यांनी जनसेवा मंडळाच्या जनार्दन आहेर आणि संदीप देशमुख यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ चार वरून 6 वर गेले आहे तर अपक्ष म्हणून निवडून आलेले सचिन करपे थोरात यांच्या समर्थक मानले जातात. विशेष म्हणजे निवडणूक प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा मंडळाला या निवडणुकीत अद्यापही…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येत असून हमाल मापारी या गटाची मतमोजणी पार पडली आहे. या गटातून अपक्ष सचिन कर्पे यांनी विजय मिळविला आहे. विजयी झालेल्या कर्पे यांनी शेतकरी विकास मंडळाच्या महेंद्र गुंजाळ आणि जनसेवा मंडळाच्या सोमनाथ दिघे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. कर्पे हे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असल्याने ते शेतकरी विकास मंडळ सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाचे संख्याबळ 5 वर गेले असून विरोधी राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या…
