Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. खचलेल्या या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेने केली आहे. अन्यथा यासाठी संस्थेच्या वतीने संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेल्या या पुलावरून साई मंदिर, प्रवरा नदी, गंगामाई घाट, पंपिंग स्टेशन, कासारवाडी, साईनगर, घोडेकर मळा, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालय, मालपाणी हेल्थ क्लब आदी ठिकाणी ये-जा करता येते. साधारणत: ऑक्टोंबरमध्ये या भागाला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल मानवनिर्मित चुकांमुळे कसला आहे. जवळपास सहा महिन्याहून अधिक काळ हा…

Read More

रविवार विशेष ○ प्रवीण पुरो कायदे मंडळाची दोन सभागृहे खोटं बोलण्याची व्यासपीठ होऊ नयेत, असं कितीही म्हटलं तरी आता या सभागृहांचा वापर रेटून खोटं बोलण्यासाठी केला जातो, हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. आपल्यावरील आक्षेप ढकलून देण्यासाठी सत्ताधारी खुलेआम खोटेपणा करतात आणि हा खोटेपणा बहुमताच्या जोरावर टाळ्यांच्या गजरात खपवून घेतात. असे एक ना अनेक प्रसंग विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आताही घडतात आणि यापूर्वीही घडून गेलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या हक्कभंग प्रकरणानंतरही त्यांनी घेतलेली कोलांटउडी हा याच पठडीतील विषय ठरला आहे. कितीही खोटं बोललं तरी जिथे काहीच बिघडत नाही, असं हे ठिकाण बनलंय. आपण शहाण्यासारखं वागलं पाहिजे याचं भान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील अडीच लाख रुपयांचे लूट करणारे, पंचर दुकानदारावर हल्ला करून त्याचे मोटरसायकल लांबविणारे तीन गुन्हेगार नगरच्या स्थानिक पुणे शाखेला पकडण्यात यश आले. पेट्रोल पंपावरील लुटी सोबतच नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खून प्रकरणाचाही उलगडा या आरोपींकडून करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) संगमनेरच्या पठार भागात साकुर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर तिघा सशस्त्र चोरट्यांनी आपल्याकडील दोन्ही दुचाकीमध्ये पेट्रोल भरत पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अडीच लाखाची लूट केली होती. तत्पूर्वी याच आरोपींनी माहूली गावच्या शिवारात एका पंचर दुकानदाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत त्याच्यावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर गीता परिवाराच्या संगमनेर शाखाध्यक्षपदी संजय कर्पे, उपाध्यक्षपदी शोभा बाहेती आणि सचिवपदी अभिजीत गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ बालसंस्कार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गीता परिवाराच्या संगमनेर शाखेतील पदाधिकार्‍यांच्या निवडी गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली गीता परिवाराच्या संस्कार बालभवन येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आल्या. कोषाध्यक्षपदी अमित चांडक, संगमनेर केंद्र पालक व जिल्हा विस्तारक पदासाठी गणेशलाल बाहेती, केंद्र विस्तार प्रमुख पदावर कुंदन जेधे, सतीष इटप, अर्जुन युवा मंच प्रमुखपदावर पूजा दिक्षीत, परिवार संपर्क समितीच्या प्रमुखपदी  सरोज आसावा, परिवार संपर्क समिती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या बारा वर्षापासून विविध समाज उपयोगी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिवजयंती उत्सव युवक समितीच्यावतीने यावर्षीदेखील महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १०३७ शिवभक्त रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर आता यावर्षी ११११ रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. या महा रक्तदान संकल्पमध्ये संगमनेरकरांनी सहभाग घेण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. एका तपाची वाटचाल पूर्ण करणाऱ्या उत्सव समितीने यापूर्वी कोरोनासारख्या भयंकर आजारातदेखील गोरगरिबांना अन्नदान केले होते. सांगली, सातारा सारख्या भागात पूरग्रस्त नागरिकांना किराणा व संसार उपयोगी वस्तूचे वाटप केले. गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घेतला जातो. शिवरायांचे विचार मनामनात रुजवण्यासाठी व्याख्याने तसेच विद्यार्थ्यांसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबईः मी आता ७० वर्षांचा झालो आहे. मी १४ वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगली आहे. त्यामुळे आता माझी मुदतपूर्व सुटका करा, अशी मागणी करणारी याचिका डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केली आहे. या याचिकेवर १५ मार्चला सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गवळी सध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. कैद्यांच्या मुदतपूर्व सुटके संदर्भात २००६ साली राज्य शासनाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे अशा गौरवशाली दिवसांचे औचित्य साधून कैद्यांचे मुदतपूर्व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई :  नोकरीसाठी इच्छुक असलेल्या करिता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने या संदर्भातील आदेश देखील काढला आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्ष नोकर भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी केलेली विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या सभागृहातील पहिल्याच भाषणात या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत आता सरकारकडून दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील पतसंस्थांमध्ये गैरव्यवहाराचे प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. तसेच यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती येत्या पंधरा दिवसात स्थापन केली जाणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. सहकार मंत्री सावे म्हणाले, गैरव्यवहारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी ही समिती काम करेल. राज्यातील पतसंस्थांसाठी असणाऱ्या विविध मानकांचे नियमितपणे देखरेख करण्यासाठी वार्षिक आणि मासिक माहिती व्यवस्थापन प्रणाली सहकार आयुक्तांच्या 23 ऑगस्ट 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार लागू केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतूदींनुसार स्थिरीकरण व तरलता निधी 11 सप्टेंबर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एसटीच्या मोडक्या, तुटक्या बसवर राज्यशासनाच्या जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार असल्याची टीका करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधीत कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. मोडक्या तुटक्या एसटी बसेस वर जाहिरात केल्याच प्रकरण विधिमंडळात अजित पवार यांनी गुरुवारी उघडकीस आणले होते. त्यानंतर प्रशासनाकडून तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संदर्भात पवार म्हणाले, राज्य शासनाने जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा तो पैसा एसटीच्या दुरुस्ती, देखभाल आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी वापरावा. विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला विरोध करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,…

Read More