Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज काय ग !!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी ? ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अंत्यत केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापर भरत बोलली ….. ताय, वंजळभरच पायजेती.. द्याकीव. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती. अनघा – नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून. असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांनी मोठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी पकडली असून यात 1 कोटी 28 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्यासह लाखो रुपये किमतीची दोन वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहे. नासिकहून मुंबईच्या दिशेने दोन वाहनांमधून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इगतपुरी जवळील ग्रँड परिवार हॉटेल समोर वाहन पकडण्यासाठी सापळा लावला होता. पोलीस पथकाने संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यांना दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी…
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी (उमाका वृत्तसेवा) – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार असून डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धीसारखे अनेक प्रकल्प राज्यात राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना २१ इंच लांबीची गुप्ती जवळ बाळगणाऱ्या चार जणांना संगमनेर तालुक्यातील शिवारामध्ये वडगाव पान ते तळेगाव रस्त्याच्या पाटावर करुले शिवारात पकडण्यात आले आहे. आरोपी पैकी तिघेजण बुलढाणा जिल्ह्यातील असून एक आरोपी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील आहे. कैलास अशोक सावंत (वय २४ वर्ष), मारुती बळवंत सावंत (वय ७० वर्ष, दोन्ही रा. मु. गोसिंग गाव, पोस्ट नांदुरा, जि. बुलढाणा), राजू रावसाहेब शिंदे (वय २३ वर्ष, रा. मुंबरा पो. बोरजवळा ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जितेश भाऊसाहेब गोडे (वय २४ वर्ष, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, सर्व हल्ली रा. समनापुर, ता. संगमनेर) अशी आरोपींची…
अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगरमध्ये मोठे भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर मध्ये आले असता त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी त्यांना तुमच्या शेजारी बसलेल्या (विखे-शिंदे) दोन नेत्यांमध्ये वाद असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी मार्मिक उत्तर देत मी त्यांना घेऊन बसलो आहे. वाद असला तरी वादळ नाही, तो चहाच्या पेल्यातला वाद आहे, तो संपलेला आहे… त्यामुळे चिंता करू नका. अशा शब्दात या वादावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले बघा व्हिडिओ…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगर दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीनंतर फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यावेळी ते म्हणाले; नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. तुम्हाला काम पाहिजेत, म्हणून ते बोलतात. आम्हाला भरपूर काम आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही. जलजीवन मिशनच्या सगळ्या कामांना केंद्र सरकारने पैसा दिला असला तरी या कामांचे टेंडर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निघाले आहे. केंद्र…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिक ते शिर्डी महामार्गावर सिन्नरच्या पांगरी गावाजवळ नादुरुस्त झालेल्या व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसच्या चालकाने कंबरेच्या करदोऱ्याच्या सहाय्याने बसच्या छताला लटकून फाशी घेतली. राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार- १ चे चालक राजू हिरामण ठुबे (वय ४९) असे मयत चालकाचे नाव आहे. बस चालक ठुबे हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवशाही बस (एमएच – ०९, इएम -१२८०) घेऊन निघाले होते. शिवशाही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदेवस्तीजवळ येताच नादुरुस्त झाली. महिला वाहकाने प्रवाशांना अन्य बसमध्ये बसून दिल्यानंतर बस नादुरुस्त झाल्याची माहिती संबंधित आगारांना कळविण्यात आली. त्यानंतर प्रवासी व महिला वाहक दुसरा…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून तिला गरिबांसाठीच्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवून तिच्याजवळील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ‘सय्यद’ नावाच्या चोरट्याने लांबविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी पोलीस ठाण्यासमोरील कुदळ मिसळ समोर घडला. पद्मा कांतीलाल चोरडिया (वय 75 वर्ष, रा. साकुरी, ता. राहाता) या महिलेने या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, वृद्ध महिला बाभळेश्वर येथून संगमनेरला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसली होती. याचवेळी तिच्यासोबत एक अनोळखी इसम बसमध्ये बसून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याने आपले नाव…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)- राष्ट्रपतीपद हे देशाचे सर्वोच्च पद असून नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीचे उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावर महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मु या आदिवासी समाजातील आहेत. उद्घाटनाचा अधिकार हा राष्ट्रपती महोदयांचाच आहे. मात्र असे होताना दिसत नाही हे संपूर्ण देशाला वाईट वाटणारे आहे. आदिवासी, मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी…
