Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो?…
कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमच्या सरकार काम करत नसून आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडी येथील घटने संदर्भात माहिती देताना सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिंदे म्हणाले, इर्शाळवाडी दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला असून त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे सिडकोद्वारे त्यांना आम्ही घर बांधून देणार आहोत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्ताने शुक्रवारी (ता. 28 जुलै) तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले. “झाडे लावा, झाडे जगवा” वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल याबाबत जनजागृती करून गावात वृक्ष लागवड करण्यासाठी वृक्षांचे वाटप करण्यात आले. वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रमावेळी आम्ही हिवरगावकर मित्र मंडळाचे पदाधिकारी सहदेव कोळगे, माधवराव ठुबे, ज्येष्ठ नागरिक राजाराम बोंबले, संदीप वाकचौरे, ज्ञानेश्वर रेवगडे, अंकुश वाकचौरे, गोरख कदम, शौकत शेख, शैलेश रेवगडे, दत्ता रेवगडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगावचे मुख्याध्यापक विजय आंबरे, बंडू वाकचौरे, अस्मिता ठुबे, मीनल बिडवे, शेख मॅडम…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी उपस्थित राहणे हा एक संकेत आहे मात्र सध्याच्या सरकारकडून हा संकेत पाळला जात नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरातांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याला अद्याप विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. त्यातच विरोधी पक्षनेते विना विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्याचे काम राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात करत असल्याचे दिसते. थोरात दररोज सभागृहात सत्ताधारी पक्षाची कोंडी करताना दिसत आहे. मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधिमंडळात बोलताना थोरात म्हणाले, प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये जनसेवा कॅम्पच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या विविध प्रकारचे कार्ड लाभार्थ्यांना काढून देण्यात आले. याशिवाय शिवसेना आणि पक्षप्रमुख ठाकरे यांची भूमिका मुलाखतीच्या माध्यमातून विषद करणाऱ्या ‘दैनिक सामना’च्या अंकाचेही यावेळी वाटप करण्यात आले. संगमनेर शिवसेनेच्यावतीने वाढदिवसाचे औचित्य साधून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयात घेण्यात आलेल्या या जनसेवा कॅम्पमध्ये लाभार्थ्यांना आभा कार्ड, आधार कार्ड, नवीन पॅन कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणे, लहान मुलांचे आधार कार्ड हाताचे ठसे, ई श्रम कार्ड असे विविध कार्ड व शासनाच्या योजनांचा लाभ मोफत मिळवून देण्यात आला. लाभाच्या योजनांचे…
रायगडच्या पेणमध्ये झालेल्या दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद प्रगत म्हणून घेण्याचा आपल्याला खरंच अधिकार आहे का? महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्ध का नव्हते याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का? दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर या औषधांचा काळाबाजार कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असे सवाल उपस्थित करून आ. थोरात यांनी सरकारला धारेवर धरले. थोरात म्हणाले, पेणमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा थेट संबंध शासन व शासकीय यंत्रणेशी आहे. आपण पुरोगामी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला असला तरी प्रत्येकाच्या ठरलेल्या कोठ्यातून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय अधिवेशनानंतर होणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर संभाव्य आमदारांची यादी राज्यपालांना पाठविली जाईल. तत्कालीन मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘कीस करायचा आहे, माझ्यासोबत हॉटेलवर चल’ म्हणत विकृताने 23 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरात बसस्थानकावर घडली आहे. मुळच्या मनमाड येथील व हल्ली नाशिक येथे राहत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी लोणी येथील किरण किसन आहेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकून हाय केल्या गेलेल्या व्हाट्सअप मेसेजचा गैरफायदा घेत दररोज हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट करत आरोपीने पिडितेशी संपर्क वाढवला. पीडित महिलेने देखील आरोपीकडे लोणी गावामध्ये असलेल्या कॉलेजवर नोकरी भेटेल का अशी विचारणा केली असता आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला संगमनेरमध्ये माझे डॉक्टर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – येथील संगमनेर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक, स्वरसंगम संगीत प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा. डॉ. डी. एम. देशमुख यांच्या पत्नी सौ. सुरेखा (वय ८२) यांचे नासिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. संगमनेर शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रीय पुढाकार असायचा. त्यांच्या पश्चात नासिक येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद देशमुख, अमेरिका स्थित कन्या माधवी मराठे आणि पती प्रा. डॉ. डी. एम. देशमुख असा परिवार आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पुढील दोन महिने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हा निर्णय घेतला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनोचा देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. भंडारदरा निळवंडे मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अपवाद वगळता जिल्ह्यात पावसाने सर्वत्र पाठ फिरविली आहे. कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात 1 एप्रिल 2023…
