Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दिनांक १० एप्रिल – प्रतिनिधी शेतीच्या मालकी हक्कात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि वारसांच्या नोंदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी होणार असून, वारसांच्या नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वारस नोंदीची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होऊन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अडचणी…
संगमनेर, दि. १० एप्रिल प्रतिनिधी – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला आणि मिर्झापूर या गावांतील गारपिटीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. टोमॅटो उत्पादक गणेश वलवे आणि ऊस उत्पादक व भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे…
निवडणूक विशेष | अनंत पांगारकर अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पायाभरणी सहकाराच्या माध्यमातून झाली आहे. या जिल्ह्यात सहकारातील दिग्गज नेते असून आपापला सहकार त्यांनी आपल्या माध्यमातून शाबूत राखला आहे. जिल्ह्यातील या दिग्गजांमध्ये आजी-माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा बोलबाला आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीपासून विशेषतः अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार सुजय विखे यांच्या पराभवानंतर असलेले राजकीय वैर मोठ्या प्रमाणात वाढले होते. परिणामी संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि अमोल खताळ यांच्या रूपाने महायुतीच्या नव्या आमदाराचा उदय झाला. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरची राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे निर्माण झाली. खताळ यांच्या विजयामध्ये विखे पिता पुत्रांची ताकद असल्याने…
कोल्हापूर, दि. ९ एप्रिल – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कथित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर याने कोल्हापूरमधील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना दूरध्वनीवरून धमकी दिली होती. याच संभाषणात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सावंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर कोरटकरला अटक करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याने दाखल केलेला जामीन अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आला होता, त्यामुळे त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला…
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय विरोधी गटातील प्रमुख नेत्यांनी सर्वानुमते घेतला आहे. आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ आणि संतोष रोहोम यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर विरोधी महायुतीकडून या संदर्भात माध्यमांना आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून तातडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकात कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्सची रक्कम भरून न घेणे, अनेक मृत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील सुमारे दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नाकारणे यांसारख्या गंभीर…
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाखेर तब्बल १३३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा मोठा समावेश असून विरोधकांकडून फारसे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. विरोधी उमेदवार मैदानात नसल्याने आणि विरोधकांनी कारखान्याविरोधात समाज माध्यमातून निर्माण केलेले चित्र संपुष्टात आल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही निवडणूक पुन्हा एकदा सोपी झाली आहे. कारखान्यावरील त्यांचे अधिपत्य कायम राहणार आहे. त्यामुळे कारखान्याची वाटचाल बिनविरोध निवडणुकीकडे असल्याच स्पष्ट होत आहे. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून कारखान्याचे निवडणूक लढविण्याचे…
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाच्या हद्दीत खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही दुर्दैवी घटना आज, (बुधवार दि. ९ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. योगेश भारत आहीरे (वय २५ वर्षे, रा. रामतीर, पो. करे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका सुरक्षा कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या गावी जात असतानाही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. घारगांव परिसरातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या खंडोबा माळ परिसरातून सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेला दिसला. कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष…
मुंबई, दि. ९ एप्रिल – महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार, शासनाचे महत्वाचे ऑनलाइन सेवा पोर्टल, ‘आपले सरकार’, येत्या १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) या पाच दिवसांच्या कालावधीत तात्पुरते बंद राहणार आहे. या काळात पोर्टलवर पूर्वनियोजित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांचे काम केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आपले सरकार’ पोर्टलच्या हार्डवेअरमध्ये सुधारणा करणे आणि प्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे. यामुळे पोर्टलची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल. हे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १० एप्रिल ते १४ एप्रिल या दरम्यान पोर्टलवरील सर्व…
कोल्हापूर, दि.९ एप्रिल – राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज, ९ एप्रिल रोजी निर्णय येणार आहे. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. १२ एप्रिल रोजी कोरटकरची न्यायालयीन कोठडी संपणार असून, त्यापूर्वी न्यायालय त्याला जामीन देणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यावतीने वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले होते की, कोरटकरने पहिल्यांदा कॉल केल्यावर सावंत यांनी तो कट केला. दुसऱ्यांदा कॉल केल्यावर वेगळी भाषा वापरल्याने सावंत यांनी संभाषण रेकॉर्ड केले. मात्र, कोरटकरने पोलिसांना…
मुंबई, दि. ८ एप्रिल – विशेष प्रतिनिधी राज्याच्या नव्या वाळू रेती धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या राज्यात सुरू असलेली वाळूची डेपो पद्धती बंद करण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या डेपो येथील वाळू संपल्यावर बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घरकुल उभारण्यासाठी पाच ब्रास वाळू विनामूल्य देण्यात येईल तसंच प्रत्येक वाळू डेपोत दहा टक्के आरक्षण घरकुलासाठी असेल, असं जाहीर करण्यात आलंय. खाडीपात्रासाठी तीन वर्षांसाठी आणि नदीपात्रासाठी दोन वर्षांसाठी अशा लिलाव पद्धतीने वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात येईल. सरकारी विविध इमारतींच्या बांधकामामध्ये एम सँड म्हणजे कृत्रिम वाळूचा वापर केला जाईल. तसंच पुढील कॅबिनेटमध्ये नैसर्गिक वाळू देण्याचं…
