Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग पाच वर्ष या मुलीला धमकावत, घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत, ब्लॅकमेलिंग करून हा प्रकार घडला आहे. विनोद दत्तू गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याविरोधात एकोणवीस वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 376, 376(2), (I,N), 506 कलमान्वये व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – कोपरगावच्या दर्शना पवार हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले आहे. संशयित आरोपी आणि दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एमपीएससी परीक्षेत यश मिळवत रेंज फॉरेस्ट ऑफिसर (RFO) झालेल्या दर्शनाचा मृतदेह काटवणामध्ये आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस तपासात ती मित्र राहुल हंडोरे यांच्यासोबत राजगडावर गेली होती. मात्र काही वेळानंतर राहुल हंडोरे हा एकटाच गडावरून खाली आल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेनंतर तो गायब झाल्याने या हत्याप्रकरणी पोलिसांची संशयाची सुई राहुलच्या दिशेने…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – तक्रारदाराच्या कुटुंबीयांवर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणारा लाचखोर पोलीस हवालदार चार हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे (नेमणूक बेलवंडी पोलीस स्टेशन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. अहमदनगर एसीबीचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. तक्रारदाराने एसीबीकडे केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार त्याची पत्नी, मुलगी व मुलगा यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात 1 जून 2023 रोजी गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये 12 जून रोजी लाचखोर आरोपी…
समनापुर येथे दूध संघाच्या मेडिकल शुभारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादित होत असून साखर कारखाना व दूध संघामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली आहे. संगमनेरचे चांगले वातावरण काहींना पहावत नाही, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. संगमनेर तालुक्याचा विकास व प्रगतीमुळे राज्यात सन्मान होत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. समनापुर येथे दूध संघाच्यावतीने ‘राजहंस मेडिकल’च्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संचालक विलास वर्पे, संतोष मांडेकर, डॉ. प्रमोद पावसे, सोमनाथ जोंधळे, सरपंच कमलताई बर्डे, भास्कर शरमाळे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, वाळू व्यवसायातून सुरु असलेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात सेवा, समर्पण आणि गरीबाच्या कल्याणासाठी काम झाल्याने भारत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. सर्व समाजाचा विकास आणि उन्नती करण्याचे स्वप्न केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार साकारीत आहे. सरकारची नऊ वर्षातील ही कामगिरी सोशल मीडियातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन हिमाचल प्रदेशचे प्रभारी तथा चंदिगड प्रदेश अध्यक्ष संजय टंडन यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल @9 अभियानांतर्गत शिर्डीमध्ये ‘सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्ती भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टंडन बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सामाजिक क्षेत्रात वेगळा दबदबा असलेल्या व विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून संगमनेरकरांच्या मनात स्थान निर्माण करणार्या राजस्थान युवक मंडळाच्या अध्यक्षपदी उद्योजक मनीष मालपाणी यांची फेरनिवड करण्यात आली. तर मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सम्राट भंडारी, उपाध्यक्षपदी सुदर्शन नावंदर, खजिनदारपदी व्यंकटेश लाहोटी, सहखजिनदार आदित्य मालपाणी, सचिवपदी ओंकार इंदाणी व सहसचिवपदी आनंद लाहोटी यांच्या नावावर एकमत झाले. संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राला विस्तृत करणारा, राज्यात नावारुपाला आलेला संगमनेर फेस्टिव्हल, शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी डास निर्मुलन मोहिम, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, हायटेक पद्धतीचा अवलंब करुन दरवर्षी होणारेे माहेश्वरी वधु-वर परिचय संम्मेलन अशा विविध उपक्रमांद्वारे मंडळाने शहराच्या सामाजिक क्षेत्रात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी पहाटे दोन वाजेपर्यंत ‘कोंबिंग ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. आगामी काळात येऊ घातलेले सण, उत्सव शांततेमध्ये पार पडावेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर एकत्रित रित्या एकाच वेळी कारवाई करण्याच्या उद्देशाने संगमनेर शहर संगमनेर तालुका घारगाव आश्वी अकोले आणि राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन राबविण्यात आले. यात संगमनेर उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यासंदर्भात पोलीस प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मंगळवारी रात्री पोलीस प्रशासनाने दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल ४३ जिवंत गोवंश जनावरे कत्तली होण्यापूर्वीच वाचविली आहेत. विशेष म्हणजे यातील एका कारवाईत जिवंत गोवंश जनावरांनी आरडाओरडा करू नये, यासाठी कत्तलखाना चालकाने गोवंश जनावरांच्या तोंडाला काळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या चिकटविण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात दोघा कत्तलखाने चालकांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित सन १९९५ कलम ५, ९(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज | सकारात्मक माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं. काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली. मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?” ती म्हणाली, “ नाही. “बडी बेंच” नवा नाही.…
