Author: अनंत पांगारकर

संगमनेर (प्रतिनिधी): राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विकास सुरूच आहे. तालुक्यात विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, आता आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील पाच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा विकास होणार आहे. हा निधी श्रीक्षेत्र वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आणि इतर चार गावांच्या तीर्थक्षेत्रांसाठी मंजूर झाला आहे. आमदार तांबे यांनी वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यापूर्वी वेळोवेळी या देवस्थानला विविध योजनांमधून…

Read More

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ- आज तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. मिथुन- आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये लक्ष केंद्रित करा. आर्थिक व्यवहार जपून करा. कर्क- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सिंह- आज तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहाल. कामाचे योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कन्या- आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळख होईल. तूळ- आज तुम्हाला आर्थिक…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ (I Love Muhammad) चा बोर्ड लावल्याबद्दल 25 मुस्लिम तरुणांवर दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात संगमनेर येथील मुस्लिम समाजाने आज (सोमवार) जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सय्यदबाबा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर, कानपूरमधील अन्यायकारक कारवाईचा निषेध करत, प्रांत अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी स्वीकारले. काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये बरावफात (मिलाद-उन-नबी) च्या धार्मिक उत्सवादरम्यान, 25 मुस्लिम तरुणांनी ‘आय लव्ह मुहम्मद’ असा बोर्ड रस्त्यावर लावला होता. या संदर्भात संगमनेरमध्ये मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, ही कृती पैगंबर मुहम्मद…

Read More

सांगली – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेविरोधात आज सांगलीत ‘महाराष्ट्र संस्कृती बचाव’ मोर्चा काढण्यात आला. जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना पडळकर यांनी “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. पडळकर यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, अशी भावना व्यक्त करत अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “असंच…

Read More

संगमनेर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी परीक्षा शुल्कात 20% वाढ केल्याच्या निषेधार्थ, ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने सोमवारी संगमनेरमध्ये आंदोलन केले आहे. ही शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत आंदोलकांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. ‘छात्र भारती’चे अनिकेत घुले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याबाबत बोलताना अनिकेत घुले म्हणाले, पुणे विद्यापीठ खोटं बोलत आहे की त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून कोणतीही शुल्कवाढ केली नाही. पूर्वी 25,000 रुपये असलेले बीसीएचे शुल्क आता 40,000 रुपये झाले आहे. तसेच, 14,000 रुपये असलेली इतर अभ्यासक्रमांची फी 30,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. ही वाढ गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणारी आहे. घुले…

Read More

घोटी: महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीच्या पावन पर्वात भक्ती, श्रद्धा आणि साहसाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक गेली २९ वर्षांपासून एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा जोपासत आहेत.  १९९७ पासून, हे गिर्यारोहक दरवर्षी न चुकता नवरात्रीमध्ये शिखरावर घटस्थापना करतात आणि विजयादशमीपर्यंत दररोज कळसुबाई मातेची पूजा-अर्चा करण्यासाठी शिखर सर करतात. या वर्षी या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मंडळाने स्थापित करावयाच्या घटकलशाचे पूजन करून तो मंडळाला सुपूर्द केला. यावेळी त्यांनी गिर्यारोहकांच्या श्रद्धा आणि साहसाचे कौतुक केले आणि नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या.  या भेटीदरम्यान, गिर्यारोहकांनी मुख्यमंत्र्यांना शिखरावर आवश्यक सुविधा आणि…

Read More

संगमनेर – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी निळवंडे धरण आणि कालवे प्रकल्प पूर्णत्वास नेला यामुळे पर्जन्यछायेतील संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी आली आहे. त्यांनी पूर्ण केलेल्या निळवंडे धरण आणि त्याच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून पाणी आल्याने, एकेकाळी दुष्काळग्रस्त असलेल्या अनेक गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित झाला आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या चांगल्या पावसामुळे, डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून सतत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमधील नदी-नाल्यांवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. थोरात यांच्या प्रयत्नातून आता दुष्काळी भागात देखील पाणी फिरू लागले आहे. निळवंडे धरणाचा डावा कालवा ८५ किलोमीटर लांबीचा असून, तो…

Read More

मेष: तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल. वृषभ: आर्थिक बाबतीत थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येतील. मिथुन: नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. कामामध्ये नवीन संधी मिळतील आणि उत्साह कायम राहील. कर्क: आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, पण शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल. सिंह: सर्जनशीलता वाढेल आणि प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कन्या: कामाचा ताण वाढेल, पण तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुळ: वैवाहिक जीवनात आनंदी क्षण येतील. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. वृश्चिक: महत्त्वाचे निर्णय घेताना संयम पाळा.…

Read More

बेलापूर (अकोले): बिबट्याच्या हल्ल्यात बावीस वर्षीय आदिवासी शेतमजुराचा मृत्यू झाल्याची अकोले तालुक्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. पप्पू बाळू दुधवडे (रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, अकोले) असे ठार झालेल्या दुर्दैवी शेतमजुराचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना 21 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ समोर आली. या घटनेमुळे दुधवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, बेलापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू दुधवडे हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी ते कामावरून घरी परतत असताना, रात्री त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी…

Read More

नाशिक – नाशिकच्या पंचवटीतील गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांसोबत झालेल्या बैठकीत आणि गोळीबाराचा कट रचण्यात पाटील यांचा सहभाग आढळल्यामुळे ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटीतील फुलेनगर परिसरात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्व वैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.  काही दिवसांपूर्वीच राहुल धोत्रे खून…

Read More