Author: अनंत पांगारकर
मुंबई: ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची नात आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या पुतणी सौ. गिरीजा पिचड-म्हात्रे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस पक्षाची विचारधारा मान्य करून गिरीजा पिचड यांनी पक्षात प्रवेश केला, यावेळी सपकाळ आणि थोरात यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गिरीजा पिचड यांच्या पक्षप्रवेशामुळे आदिवासी समाजाला एक नवे आणि सक्षम नेतृत्व मिळाल्याचे मत व्यक्त केले. त्या आदिवासी समाजाच्या न्याय-हक्काची लढाई लढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर तसेच अनेक शैक्षणिक संस्थांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल कोणाच्या चुकीमुळे कोसळला, हे संगमनेर शहर आणि पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हट्टापायी आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही दुर्घटना घडली. जनतेचा तीव्र विरोध असतानाही, सत्ताधाऱ्यांनी एस.टी.पी (STP) गटारीचा जो वादग्रस्त आराखडा तयार केला, त्यातूनच या समस्येने मूळ धरले असल्याचे टीका शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे. सध्या पालिका निवडणुकीचे वातावरण तापत आहे या पार्श्वभूमीवर सूर्यवंशी म्हणाले, तत्कालीन खासदार स्व. बाळासाहेब विखे साहेब यांच्या निधीतून बांधलेल्या, अतिशय सुस्थितीत असलेल्या या पुलाचे गटारीचे…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, जिल्हा नियोजन व विकास समितीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्ह्यात तब्बल ११५० बिबटे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये एवढा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी आणि वन विभागाशी सतत संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून…
मेष (Aries): मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात यश आणि चांगला नफा मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. परदेशाशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. आज भाग्य 72% तुमच्या बाजूने आहे. वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे, विशेषत: भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. प्रेम जीवनात नवीनता आणि गोडवा येईल. मिथुन (Gemini): आज तुमचे मन अध्यात्माकडे आकर्षित होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळी भेट देण्याची योजना होऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस…
मेष (Aries): नवीन घर खरेदीसाठी दिवस चांगला आहे. कामावर तुमच्या बॉसकडून आश्चर्यचकित करणारी घटना घडू शकते. कायदेशीर प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा संवाद लोकांना प्रभावित करेल. वृषभ (Taurus): आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो, त्यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. घरातील कामात केलेले बदल फायदेशीर ठरतील आणि तुमची निर्णयक्षमता सुधारेल. मिथुन (Gemini): व्यवसायात असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे, कारण तुम्ही तांत्रिक उपकरणे व्यवसायात समाविष्ट करू शकता. मित्रांसोबतचे संबंध चांगले राहतील, परंतु दूरच्या नातेवाईकांमुळे आईसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer): आजचा दिवस सुखसोयी आणि आनंद वाढवणारा आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, ज्यामुळे आनंद मिळेल. सर्जनशील कामांमध्ये रुची…
संगमनेर – प्रतिनिधी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात मोठी कारवाई करत गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्या आरोपींकडून तब्बल १२ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. शहर पोलिसांच्या नाकासमोर सुरू असलेल्या या कत्तलखान्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. गुन्हे शाखेला जमते ते स्थानिक पोलिसांना का जमत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे…
मेष (Aries): आजचा दिवस सुखद आणि रोमँटिक असेल. भौतिक सुखांचा आनंद घेता येईल. कुटुंबीयांची मदत मिळेल आणि लोकांसोबत चांगले संबंध राहतील. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. एखादी मोठी डील आज फायनल होऊ शकते. भाग्य ८८% राहील. वृषभ (Taurus): व्यापारात उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहीण आणि नातेवाईकांशी संपर्क साधता येणार नाही. सहकाऱ्यांसोबतचे संबंध बिघडू शकतात. तुमचे व्यक्तिमत्व आज कमकुवत राहू शकते. मिथुन (Gemini): तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधाऱ्या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. बाहेरील कामे आज दमवणूक करणारी आणि ताणतणावाची असू शकतात. कर्क (Cancer): आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी किंवा व्यवहारांमुळे तुमच्या भावना दुखावतील. ताण वाढत आहे, त्यामुळे सावध राहा आणि…
संगमनेर – गेल्या काही वर्षांपासून नगरपालिका, नगरपंचायतीसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या भावी नगरसेवकांचा प्रचार समाज माध्यमातून सुरू झाला असला तरी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व माघारी नंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उलटलेल्या दोन दिवसांमध्ये अद्याप जिल्ह्यातील एकाही नगरपालिका, नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवाराने नगराध्यक्ष अथवा सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या संभाव्य इच्छुकांनी समाज माध्यमातून आपल्या उमेदवारीचा प्रचार सुरू केला आहे. मात्र प्रत्यक्षात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सध्या तरी संभाव्य नगरसेवक सोशल मीडिया पुरते मर्यादित राहिले आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षश्रेष्ठीं समोर उमेदवारी देताना मोठे पेच…
संगमनेर – कांद्याला केवळ 180 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वडगाव पान (ता. संगमनेर) येथे आज, (दि. ११ नोव्हेंबर) महायुती सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने तीव्र आंदोलन केले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे टाकून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला. वडगाव पान येथील शेतकऱ्यांनी सध्याचे महायुतीचे केंद्र आणि राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार असल्याचा आणि ते शेतकरी विरोधी असल्याचा थेट आरोप केला. राज्य सरकारकडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नसल्याचा दावा करत, संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये टाकून निषेध व्यक्त केला. खड्डे बुजवण्यासाठी ही आमच्याकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राहुरी/अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी राहूरी तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या ‘कदम टोळी’वर अत्यंत कठोर कारवाई केली आहे. खून, दरोडा, आणि शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम याच्यासह एकूण चार सदस्यांना जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 अंतर्गत ही कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये टोळीप्रमुख नितीन भाऊसाहेब कदम (रा. धामोरी खुर्द) सोबतच स्वप्नील रमेश बोरुडे (रा. चिंचविहिरे), गणेश नामदेव जाधव (रा. बारगांव नांदूर), आणि नितीन दत्तात्रय हरिश्चंद्रे (रा. तमनर आखडा) यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनुसार, नितीन कदम आणि त्याच्या…
