Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर, दि. ७ – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित आवश्यक निधीसह प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आयोजित जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे धार्मिक पर्यटनात मोठी…
अहिल्यानगर दि. ७- शासनाच्या ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ उपक्रमामुळे नागरिकांना कुठल्याही तालुक्यातील मिळकतीची दस्तनोंदणी जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात करता येणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेंद्र एस. महाबरे यांनी दिली आहे. शासनाने १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम १ मे पासून सुरु केला आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातील समाविष्ट सर्व तालुक्यातील कुठल्याही गावाचे, मौजेचा दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येणार आहेत. हा उपक्रम यशस्वी झाल्यावर पुढील काळात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ यावर अंमलबजावणी होणार…
नवी दिल्ली- अखेर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या कारवाईमुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले असून, प्रत्येक भारतीयाची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांची अचूक माहिती पुरवली होती. या माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लक्ष्यावर अचूक हल्ला चढवला. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. या एअर स्ट्राईकनंतर देशात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीमाभागावर विशेष लक्ष ठेवले जात असून, कोणत्याही…
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी, चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची आज, मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या ऐतिहासिक बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि विविध सामाजिक घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला उजाळा मिळणार आहे, तसेच राज्यातील महिला, धनगर समाज आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे: *…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान येथील उपबाजारात आज (मंगळवारी ६ मे) लूज कांद्याच्या लिलावाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बाजारात तब्बल ३४ ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला उच्चांकी १२७३/- प्रति क्विंटल भाव मिळाला, तर गोल्टी कांद्याने ५०० ते ८०० प्रति क्विंटलचा भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. वडगावपान उपबाजारात कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याने त्यांना हा बाजार सोयीस्कर वाटत आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी आपला लूज कांदा विकल्यानंतर त्यांना त्वरित…
नवी दिल्ली- राज्यात तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (६ मे २०२५) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. येत्या चार महिन्यांच्या आत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्यातील प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर पालिकांच्या निवडणुका मागील जवळपास पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित होत्या. या दिरंगाईमुळे राज्यात प्रशासकीय राजवट लागू असल्याची…
अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे धनगरी काठी, घोंगडी, अहिल्यादेवींची मूर्ती आणि पुस्तक देऊन पारंपरिक स्वागत केले. मंत्र्यांसाठी खास कांस्य धातूच्या थाळी-वाट्यांमध्ये पुरणपोळी, आमरस, शिपी आमटी, मासवडी अशा १८ पदार्थांची मेजवानी असून कर्जतची खास ओळख असलेली शिपी आमटी स्थानिक महिलांकडून तयार करून घेण्यात आली. एका कास्य थाळीची किंमत ३,९९९ रूपये आहे. ग्रामीण भागात पहिल्यांदाच होत असलेल्या या बैठकीसाठी चौंडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे स्वतः दोन…
घारगाव (संगमनेर) घारगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत, संगमनेरच्या दिशेने जाणारी एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी (क्रमांक एम.एच.१७ बी.वाय. ८५५६) थांबवून तपासणी केली असता या गाडीतून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रभाकर आण्णासाहेब गुळवे (वय ३९, रा. रणखांब, ता. संगमनेर) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (५ मे) सकाळी ११:०० वाजता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, घारगावातून संगमनेरच्या दिशेने एका पिकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी नेला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. आमदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी स्वतः कारवाई करत रविवारी रात्री समनापूर येथून वाळू भरून रायतेवाडीकडे निघालेला डंपर तनपुरवाडी रस्त्यावर पकडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन वाळू तस्करांसह डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी रविवारी रात्री जात असताना त्यांना तनपुरवाडी रस्त्यावर वाळूने भरलेला डंपर येताना दिसला. तात्काळ त्यांनी आपले वाहन थांबवून डंपर चालकाची विचारपूस केली असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाणीवाटपावरून संगमनेर तालुक्यात संघर्ष पेटला आहे. जलसंपदा विभागाच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देत, “आम्हालाही सहआरोपी करा,” अशी मागणी केली आहे. सध्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातील अनधिकृत पाइपलाइन काढण्याची मोहीम जलसंपदा विभागाने हाती घेतली होती. मात्र, शेतकऱ्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांचे नेतृत्व करत इंद्रजीत थोरात यांनी प्रशासनाच्या भूमिकेला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निमगाव पागा ते खळी…
