Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज “भुजबळ साहेबांना शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता. आता एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपचे पाप ?. जंतराव….निदान न कळणारी लबाडी तरी करा” अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटद्वारे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात सत्ताबदल झाला पण त्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधी यांची एकमेकांवर टोलेबाजी सुरूच आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे–फडणवीस यांचे सरकार आले एवढ्या मोठया सत्ता बदलानंतर आता अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही, या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप…
महाराष्ट्र संवाद न्यूज बहुचर्चित ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे तातडीने डिसेंबर अखेर पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत निळवंडे कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीसाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज सहकाराला दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी १६ ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते होत आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, तर अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेला हा कारखाना आज राज्यात आणि देशभरात सहकारी चळवळीचा मापदंड ठरला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण केली आहे. दिवंगत भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले असले तरी संगमनेरात गेल्या काही महिन्यात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या संगमनेर तालुक्यातील जनसेवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत ३४४ प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांमध्ये लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणारी ५०२ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३४४ प्रकरणे तहसीलदारांनी मंजूर केली. उर्वरित प्रकरणांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या. त्यामुळे या त्रुटी दूर करून ही प्रकरणी पुन्हा नव्याने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक दुचाकी चोऱ्या आणि प्रवाशांना लुटण्याचे प्रकार संगमनेरमध्ये सर्रासपणे घडत आहेत. येथील बस स्थानकामधून आरोपींना कुठेही तातडीने निघून जाता येते, त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी बसस्थानकामधील पोलीस चौकी पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातून भर रस्त्यावर तसेच बस स्थानक परिसरात लावलेल्या दुचाकींच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकींचा चोऱ्या करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले असल्याचे दिसते. बस स्थानकाचा परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व जास्त प्रमाणात मुलींना शहरी भागातील टपोरी मुले नाहक त्रास देण्याचे काम करत असतात. मग ती मुलींची छेडछाड…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज एकीकडे चेंबूर पोट निवडणुकीचा विषय राज्यभर चर्चिला जात आहे. तर दुसरीकडे येत्या १७ ऑक्टोबरला होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात या निवडणुकीसाठी सतरा मतदार पात्र असून त्यापैकी सर्वाधिक पाच मतदार संगमनेरमधील आहे. तब्बल २२ वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात चुरशीची लढत होत असून या निवडणुकीपासून गांधी परिवार प्रथमतः दूर राहिला आहे. अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अचानकपणे निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने खर्गे आणि थरूर यांच्यात सरळ लढत होत आहे. यामुळे यावेळी काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज स्वामी समर्थ मंदिरापासून साई मंदिर, प्रवरा नदीवरील घाटाकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने या पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या आहेत. पालिका प्रशासनाने त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी शुक्रवारी शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान गुरुवारी दुपारी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, या प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र वाकचौरे व शैलेश कलंत्री, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती सोमेश्वर दिवटे, नितीन पापडेजा आदींनी या पुलाची पाहणी केली आणि कामासंदर्भात पालिका प्रशासनाला सूचना केल्या. मात्र ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत या पुलाचे बांधकाम येते. त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई महापालिकेने आपला राजीनामा स्वीकारावा, यासाठी न्यायालयात गेलेल्या शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारण्याच्या दिलेल्या आदेशामुळे लटके यांचा चेंबूर पोट निवडणुकीतील उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली…
महाराष्ट्र संवाद न्यूज शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवर असलेला पूल खचला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल तातडीने वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. शहरात प्रस्तावित असलेल्या एसटीपी प्लांटसाठी आवश्यक असणारी आणि नुकतीच बांधण्यात येत असलेली ड्रेनेजची लाईन देखील तुटली असल्याचे निदर्शनास आले. संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईपलाईन या पुलावरून समांतर गेली आहे. आज दुपारच्या वेळी ही पाईपलाईन आणि त्याखालील पुलामध्ये मोठ्या प्रमाणात फट निर्माण झाले असल्याचे दिसून आले. तसेच पूल देखील काही ठिकाणी खचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्हाळुंगी नदीला पाणी असल्याने पुलाच्या खाली असलेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढे पारंपारिक शिक्षणाऐवजी कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य राहणार आहे. नव्या धोरणानुसार यापुढे पॉलिटेक्निकचे (तंत्रनिकेतन) शिक्षण मातृभाषेत दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित लघु उद्योग भारतीच्यावतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणार्या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्थांना यावेळी गौरविण्यात आले. मंत्री पाटील म्हणाले, देशात आता औद्योगिक क्रांती घडू लागली आहे, या क्रांतीचा वेग वाढवायचा असेल तर संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. संशोधनवृत्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचे…
