Author: अनंत पांगारकर
मुंबई, २१ जून, २०२५: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील खटले मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार, ३१ मार्च, २०२५ पर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाली आहेत, ते खटले आता मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी, शासनाने ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत दोषारोपपत्रे दाखल झालेल्या खटल्यांसाठी हे धोरण लागू केले होते. मात्र, ती मुदत संपल्याने आणि त्यानंतरही काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाल्याने, खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात, गृह विभागाने यापूर्वी २० सप्टेंबर, २०२२, १० नोव्हेंबर, २०२२, १४ सप्टेंबर, २०२३, १२ फेब्रुवारी, २०२४,…
संगमनेर, प्रतिनिधी आर्थिक व्यवहारापोटी दिलेला धनादेश न वटता परत आल्याने यासंदर्भात दाखल खटल्यात संगमनेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले याला दोन महिन्यांचा साधा कारावास आणि फिर्यादीला दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. रमेश रंगनाथ सातपुते हे हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक असलेल्या मच्छिंद्र सदाशिव नवले यांनी गाळा आणि शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरुवातीला १६ लाख रुपये आणि नंतर १९ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सन २०२१ मध्ये घेण्यात आली होती आणि ती २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत…
शुक्रवार २० जून – अहिल्यानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (शुक्रवारी) केलेल्या यशस्वी कारवाईत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून त्यांच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी मुंडे यांनी ही लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. राहुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवणे अपेक्षित होते. हा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी स्वतः दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि आज…
संगमनेर, प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्याने आरोपीला अटक करून ताब्यात घेण्याचे आदेश मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आंबी खालसा (संगमनेर) येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणल्याचा व अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले यास यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, यानंतर त्याला मध्यप्रदेशमध्ये ६ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसांसह पकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप वाढले होते. दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन मार्फत सरकार पक्षातर्फे संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर…
शुक्रवार 20 जून: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावच्या आकाशवाणी चौक परिसरात दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय वराडे (रा. जळगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे, तो एक ठेकेदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा आकाशवाणी चौकातून जात असताना, वराडे यांनी अचानक ताफ्यासमोर येत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान…
गुरुवार 19 जून – पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे सिगारेट ओढू नको असे सांगितल्याने एका 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रोहिदास काळुराम काटकर (वय 24, रा. कादवे, ता. वेल्हे, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश उत्तम जोगदंड (वय 21), उमेश ऊर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय 21), पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19), आकाश सुभाष भिसे (वय 21), आणि भागवत मुंजाजी आसुरी (वय 20) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत येथील नंदाबाई कुंभार मावशीच्या हॉटेलसमोर पाच जणांचे एक टोळके सिगारेट ओढत उभे होते. त्यावेळी…
गुरुवार १९ जून, – अकोले: मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे अकोले तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे. तालुक्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, बुधवारी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे, आंबीत धरणानंतर आता मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा प्रवाह आता मुळा धरणाकडे वेगाने झेपावला आहे. मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या जोरदार पावसामुळे मुळा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ६०० दशलक्ष घनफूट (दलघफू) क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण पूर्ण भरल्याने…
अहिल्यानगर, प्रतिनिधी: एका विवाहितेवर घरात घुसून चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी (१७ जून) सकाळच्या सुमारास घडली. पीडित विवाहितेवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडितेने बुधवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, चार अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. यातील एका संशयिताने विवाहितेच्या तोंडात कापडी बोळा कोंबला होता. त्यानंतर इतर तिघांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक अत्याचार केला. सध्या पीडितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदविण्यात आला असून…
गुरुवार, 19 जून- संगमनेर : धावपळीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. याच विचाराने एकविरा फाउंडेशन, सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आणि जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने शनिवारी, 21 जून 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात भव्य योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशन महिलांच्या आरोग्य आणि सबलीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने या निमित्ताने सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत हे भव्य योग शिबिर आयोजित…
मुंबई, १९ जून: राज्यात दूध भेसळ थांबवण्यासाठी लवकरच एक नवीन कायदा लागू केला जाईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मंत्रालयात दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या नवीन कायद्यामुळे राज्यातील दूध भेसळीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. या बैठकीला दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, तसेच राज्यातील प्रमुख दूध संघांचे प्रतिनिधी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दूध संघांच्या प्रतिनिधींनी राज्यात दुधासाठी समान दर असावा, तसेच ‘एक राज्य एक ब्रँड’, ‘एक जिल्हा एक दूध संघ’ आणि ‘एक गाव एक दूध संस्था’ स्थापन…
