Author: अनंत पांगारकर

संगमनेर – प्रतिनिधी राज्यातील महत्त्वपूर्ण सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या आणि सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर देशासाठी दिशादर्शक टिपलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एकमताने निवड झाली आहे. यासोबतच, व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग घुले यांची देखील सर्वानुमते निवड झाली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर आज (मंगळवारी) प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही कारखान्याने अनेक महत्त्वपूर्ण…

Read More

अकोले – प्रतिनिधी नवलेवाडी (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती सुमन गणपत खतोडे यांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि विद्यार्थ्यांप्रति असलेल्या समर्पण भावनेमुळे पालक अक्षरशः भारावून गेले आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून नवलेवाडीतील विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत त्यांना चक्क एक नवीन स्कुटीची खास भेट दिली आहे. अकोले येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा कौतुक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह राजूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विलास नवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. माजी नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी (अकोले) माधवराव हासे, शिक्षण विस्तार अधिकारी (मवेशी बीट) बाळासाहेब दोरगे आणि केंद्रप्रमुख…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा देखभालीअभावी बंद पडली होती. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी याची तातडीने दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नांना यश आले असून, लवकरच संगमनेर एसटी स्थानकातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू होणार असल्याचे माहिती आमदार खताळ यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार खताळ यांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना योग्य ते निर्देश दिले. त्यानुसार, एमएसआरटीसीच्या आयटी विभागाने संगमनेर बस डेपोत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच,…

Read More

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अण्वस्त्रांच्या धमक्यांना न जुमानता निर्णायक प्रहार करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे सरकार यांच्यात फरक नसल्याचेही त्यांनी ठणकावले. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पहिल्यांदाच जाहीर भाषणात बोलताना मोदींनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान सरकार आणि लष्करावर घणाघात केला. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करी अधिकारी उपस्थित राहणे, हे ‘सरकारपुरस्कृत दहशतवादा’चे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांद्वारे भारताने दहशतवादाविरोधात नवी रणनीती आखली आहे. पाकिस्तानने अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिल्याने अमेरिकेने मध्यस्थी केल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाने डॉ. अमोल कर्पे याने वैद्यकीय क्षेत्राची लाज चव्हाट्यावर आणली असतानाच आता आणखी एका हृदयद्रावक घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. एका गर्भवती महिलेला गर्भपात करायचा होता आणि या प्रयत्नात तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि संगमनेरमधील काही डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला देण्यात आलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे झालेल्या त्रासातून गर्भपात करताना तालुक्यातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. महिलेला दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे महिलेची तब्येत बिघडली. त्यानंतर संगमनेर शहरातील एका प्रतिष्ठित ‘प्रवीण’ डॉक्टरने महिलेची शारीरिक स्थिती…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांचा वेल्हाळे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले हरीबाबा देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या कार्याबद्दल वेल्हाळे ग्रामस्थांनी आमदार तांबे यांचा संगमनेर येथे सत्कार केला. हरीबाबा देवस्थान हे वेल्हाळे परिसरातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. कारखाना, मालदाड, साईखिंडी, गुंजाळवाडी, चिकणी आदी परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. यापूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने आमदार अमोल खताळ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी आमदार खताळ पाटील यांना शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचाही आमदार खताळ पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा हॉटेल येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आमदार खताळ पाटील यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे आपला आनंद व्यक्त केला. या सोहळ्यादरम्यान, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या सामाजिक…

Read More

संगमनेर – संगमनेर पोलिसांनी खांडगाव परिसरात एका कारवाईत अंमली पदार्थ असलेला गांजा जप्त केला आणि गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. सोमवारी दुपारी झाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन ज्ञानेश्वर आरगडे (वय २७ वर्षे, रा. आरगडे मळा, खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याकडून ८५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ७,६५० रुपये असून तो एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गांजा विक्रीसाठी आरोपी आला याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे खांडगाव गावाच्या शिवारात आरगडे वस्तीच्या पुढे असलेल्या डोंगराच्या बाजूला काटवन परिसरात ही कारवाई…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे युवा अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांनी जागतिक विमा क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवत मानाचा ‘एमडीआरटी’ (Million Dollar Round Table) सन्मान पटकावला आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे त्यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील अनाहिम येथे ७ ते १० जून २०२६ दरम्यान होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, आदित्य यांनी २०२३ मध्ये विमा क्षेत्रात पदार्पण करताच एमडीआरटीचा मान मिळवला. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीची मालिका कायम ठेवत २०२४ मध्ये एकाच वर्षात तीन वेळा एमडीआरटी मानांकन प्राप्त केले. या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित ‘सीओटी’ (Court of the Table)…

Read More

अहिल्यानगर, दि.११ मे:  संगमनेर शहरात गौण खनिजांची चोरी, अवैध धंदे, मटका आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्यांच्या या मागणीमुळे संगमनेरातील अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली. याच बैठकीत आमदार खताळ यांनी संगमनेर मतदारसंघातील विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याची माहिती आपल्या समाज माध्यमातून दिली आहे. आमदार खताळ यांनी वेल्हाळे येथील हरिबाबा देवस्थानाला…

Read More