Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर,प्रतिनिधी: संगमनेर शहरातील मेनरोडवर कोणत्याही सण, उत्सव किंवा मिरवणुकीमध्ये कर्कश आवाजातील डीजे वाजवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करत शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात जात प्रांताधिकारी अरुण उंडे यांना एक सामूहिक निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये, संगमनेर शहरातील मेनरोडवर डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाचे गांभीर्य मांडण्यात आले आहे. डीजेच्या दणदणाटामुळे दुकानांमधील विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, आवाजाच्या कंपनामुळे अनेक घरांमध्ये वस्तू खाली पडून नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मेनरोडवर कोणत्याही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, प्रतिनिधी: अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६) राज्यात लागू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत. या कायद्यानुसार एसईबीसी प्रवर्गाला शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षण मिळाले आहे. तसेच, न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी (ओबीसी) जातीची प्रमाणपत्रे…
आजच्या वेगवान डिजिटल युगात, जिथे बातम्या क्षणात जन्माला येतात आणि क्षणात विरून जातात, अशा स्पर्धेच्या काळात संगमनेरसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात ‘दैनिक प्रवरातीर’सारखे वृत्तपत्र सातत्याने आपले स्थान टिकवून आहे. या यशामागे आहे. एक तरुण, ध्येयवेडा आणि सामाजिक जाणिवेची जाणीव असलेला संपादक, धिरज आणि त्याचे वडील शिवपालसिंह ठाकूर. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी, धिरजने आपल्या वडिलांकडून मिळालेला पत्रकारितेचा वारसा केवळ पुढेच नेला नाही, तर त्याला सामाजिक कार्याची आणि आधुनिकतेची जोड देऊन एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांचे वडील, ज्येष्ठ संपादक शिवपालसिंह ठाकूर, यांनी ३० वर्षांपूर्वी संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज धिरज त्याच पावलावर पाऊल टाकून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. धिरजचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि नवीन संधी चालून येतील. आर्थिक बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर सहज मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. मिथुन: आज तुम्ही उत्साही आणि आनंदी राहाल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल, ज्यामुळे दिलासा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेले विजय संभाजी कुटे (वय अंदाजे ४०) हा तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासन कसून प्रयत्न करत आहेत. दरम्यान अद्यापही शोध कार्य सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीवरील छोट्या पुलावर घडली. मूळचे रंगार गल्ली, संगमनेर येथील रहिवासी असलेले विजय कुटे हे आपल्या स्कुटी गाडीवरून कचरा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती चर्चेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या प्रभा निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. आमदार तांबे म्हणाले की, गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतं. गणेशोत्सव आपल्याला नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. संगमनेरकर नागरिक हे दहा दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. विविध गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी होते, तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी नागरिक उत्साही असतात. यावेळी बोलताना त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुखी, समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी आपल्या ‘सुदर्शन निवासस्थानी’ सपत्नीक गणेशाची स्थापना केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कन्या डॉ. जयश्री थोरात आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन उपस्थित होते. यावर्षी काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस कमी आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा, अशी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शिर्डी: शिर्डी शहर आणि परिसरातील धार्मिक वातावरणात अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, साई मंदिर परिसरातून अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या ४ हॉटेल्सवर छापा टाकून ती सील करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. यापूर्वी पिटा कायद्यान्वये कारवाई झालेले हॉटेल सील करण्यासाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला मान्यता मिळताच ही कारवाई करण्यात आली. या पथकाने शिर्डी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्यावतीने यंदा गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी महसूल आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये चित्रपट अभिनेते, अभिनेत्री आणि प्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत. अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ५६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एक मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघत आहे. बुधवारी, (२७ ऑगस्ट) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सुरू होणारा हा मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातून पुढे जाणार असल्याने, जिल्हा प्रशासनाने येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शेवगावपासून पारनेरपर्यंतच्या रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. हा मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात कर्हेटाकळी (ता. शेवगाव) येथे प्रवेश करेल आणि त्यानंतर घोटण, तळणी, शेवगाव शहर, ढोरजळगाव, मिरी, माका, जेऊर, दुधडेअरी चौक,…
