Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी:  गुरु पौर्णिमेचा दिवस संगमनेरकरांसाठी धक्कादायक आणि दुःखदायक ठरला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. गटारात काम करत असताना गटारीमध्ये निर्माण झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध पडून अतुल रतन पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ या दुर्घटनेतील दुसऱ्या जखमीचा हे मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे. रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गटारीच्या (ड्रेनेज) कामावेळी विषारी वाळूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध होऊन जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न या तरुणाने केला होता. मात्र हा तरुण देखील वायूच्या संपर्कात आल्याने तो देखील…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज (गुरुवार, ११ जुलै) एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून, कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतुल रतन पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी अशी जखमींची नावे असल्याची व जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्या न्यायालयाने संगमनेर शहरातील एका मारहाण प्रकरणी नुकताच निकाल दिला असून यात एका आरोपीला दोषी ठरवत अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. २४ जून, २०१५ रोजी राजाराम लक्ष्मण कढणे (तक्रारदार) यांनी संगमनेर बसस्थानकाजवळील गणेश फ्रूट्स येथून आंबे खरेदी केले होते. त्यातील दोन आंबे खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी ते पुन्हा दुकानात गेले असता, अमोल अशोक भवर याने आंबे परत घेण्यास नकार दिला आणि पैसे देण्यासही नकार दिला. त्यानंतर भवर यांच्यासह तिघा जणांनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. आयुब कादर इनामदार याने तक्रारदाराला जीवे मारण्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संगमनेर ते शिर्डी पायी दिंडीत सक्रिय सहभाग घेतला. या दिंडीदरम्यान डॉ. थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना सेवा पुरवली. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागातून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या अनेक दिंड्यांसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली. या दिंडीत डॉ. जयश्री थोरात यांनी स्वतः पायी चालत, साई भजने गात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी साई भक्तांना प्रसाद वाटप, आरोग्य तपासणी आणि इतर आवश्यक व्यवस्थांमध्येही सक्रिय योगदान दिले. यावेळी बोलताना डॉ. जयश्री…

Read More

मुंबई:  नगर पालिका हद्दीत आणि हद्दीलगत नागरी वस्तीत लागू असलेल्या तुकडाबंदी कायद्यामुळे बाधित झालेल्या लाखो कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेले सर्व तुकडाबंदी व्यवहार नियमित केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. सद्यस्थितीत तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा घेतलेल्या नागरिकांना बांधकाम करण्यास किंवा त्या जागांचे व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, महसूलमंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिका,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात मे आणि जून महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची चांगली उपलब्धता आहे, यामुळे नदीमार्गे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, याच्या उलट परिस्थिती निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात आहे, लाभक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन, निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आणि माजी जलसंपदामंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले असून आपल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे की, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या…

Read More

संगमनेर, ०९ जुलै २०२५-प्रतिनिधी:  संगमनेर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ३५ लहान वासरे ताब्यात घेऊन एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी कुरण येथील कब्रस्तानजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. कुरण येथील शौकतअली मोहम्मद शेख (वय ३०, रा. कुरण) याने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत. या माहितीच्या आधारे डॉ. सोनवणे यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक सोनवणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल…

Read More

अहिल्यानगर:  अहिल्यानगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरलेल्या निळवंडे (ऊर्ध्व प्रवरा) प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने ५,०२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने या निधीला मान्यता दिल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या १५९ व्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाला ही मान्यता मिळाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांतील आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एकूण ६८ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निधीमुळे प्रकल्पाच्या कालव्यांच्या उर्वरित कामांना गती मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. १९७० मध्ये…

Read More

मुंबई:  सध्या राज्यात मराठी-अमराठी वादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कडक आदेश जारी केले आहेत. यापुढे कोणीही त्यांच्या परवानगीशिवाय वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी संवाद साधू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. या आदेशानुसार, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा नेत्याने स्वतःचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकू नयेत किंवा व्यक्तिगत प्रतिक्रिया देऊ नयेत. महत्त्वाचे म्हणजे, पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनाही राज ठाकरे यांच्या पूर्वपरवानगीशिवाय माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. मीरा भाईंदर येथे मनसे कार्यकर्त्यांकडून एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषेच्या…

Read More

संगमनेर, ०९ जुलै २०२५- प्रतिनिधी:  संगमनेर शहरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत लाखो रुपयांचे गोमांस आणि हत्यारं जप्त करण्यात आली असून, तिघे आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने, या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास तीनबत्ती चौकात थांबलेल्या पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या अनुषंगाने माहिती मिळाली होती. संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथील फैजु फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुटन कुरेशी…

Read More