Author: अनंत पांगारकर
शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष – कामाचे नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. सहकारी सहकार्य करण्यास नाराज असतील. त्यामुळे गोड बोलूनच काम करून घ्यावे लागणार आहे. वृषभ – व्यापार-व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होतील. कामाचा व्याप वाढणार आहे. भागीदाराचे सहयोग मिळेल. त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील व मार्ग सापडतील. कामे पूर्ण होतील. मिथुन – तुमच्या मनातील तणाव दूर करा, तरच काम सुरळीत होतील. आनंदी राहा आणि कामाला लागा. उत्साहाने काम केल्यास सुरळीत कामे होतील. जास्तीची कामे मात्र तुम्हाला करावी लागणार आहेत. कर्क – आपल्या कल्पकतेचा व सृजनशीलतेची साहित्यिक लेखक कवी यांना चांगला फायदा होईल. नवी कामे मिळतील,…
गुरुवार, १७ ऑक्टोंबर संगमनेर – विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असतानाच संगमनेरमध्ये अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ४२ लाख १५ हजार रुपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले. पोलिसांनी पकडलेली रक्कम हवाल्याची असल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येते. पोलीस अधीक्षकांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांचा, बेहिशोबी मालमत्ता बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे…
गुरुवार, १७ ऑक्टोबर अहिल्यानगर – जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा वावर वाढला असल्याने आणि सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असल्याने ऊसतोड करत असताना शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांनी केले आहे. ऊसतोड सुरू असताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते. मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. खूप वाकुन ऊसतोड करू नये. अशा वेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या…
गुरुवार, १७ ऑक्टोंबर अहिल्यानगर – जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील पोलीस, उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करून अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणाऱ्या भेटवस्तूंच्या वाहतूकीला प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अविनाश बारगळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, देवेंद्र कटके आदी उपस्थित होते. शेजारील जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम…
गुरुवार, १७ ऑक्टोबर अहिल्यानगर – निवडणूक आयोगाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अहिल्यानगर शहर हे दोन विधानसभा मतदारसंघ “खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील” ठरविले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त पथके तैनात केली जाणार आहेत. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. गत विधानसभा निवडणुकीत तत्कालीन अहमदनगर आणि सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील ठरवला गेला होता. यावेळी मात्र संगमनेरसह अहिल्यानगर शहर मतदारसंघाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणजे काय? केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी वेळी खर्चाच्या…
गुरुवार, १७ ऑक्टोबर अहिल्यानगर – भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत. वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे…
गुरुवार, १७ ऑक्टोबर आरपीआय (आठवले) पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष अशोक अभंग यांचे नुकतेच निधन झाले. दलित चळवळीतील कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या अभंग यांच्या कुटुंबियांचे सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी आठवले यांच्या समवेत अहिल्या नगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, भीमा बागुल, शहराध्यक्ष कैलास कासार, आशिष शेळके, शानू बेगमपुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले सोमवारी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. ज्यावेळी त्यांनी अभंग यांच्या कुटुंबियांचे भेट घेत दुःख व्यक्त केले.
गुरुवार, १७ ऑक्टोंबर अहिल्यानगर – निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी म्हटले असून तसे आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ही बंदी राहणार आहे. बंदी दरम्यानच्या या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भात पोस्टर्स बॅनर्स पॅम्प्लेटस्, कट आऊटस् किंवा जाहिरात फलक लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, या आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे, निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे, राजकीय कामासाठी सदर…
गुरुवार, १८ ऑक्टोबर २०२४ मेष – विरोधकांनी तोंड वर काढले तरी त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल. आजचे धोरण ठरवताना पूर्ण विचार करून मगच अमलात आणावे. वृषभ – नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश येण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. काही कुयोग जरी असले, तरी तुम्ही सर्व चांगल्या तहेने निभावून नेणार आहात. प्रगती होणार आहे. मिथुन – कुठलेही काम विचारपूर्वक करा, अति धाडस करू नका. बोलताना संयम पाळा, फसवणुकीपासून सांभाळा. कोणतेही काम अर्धवट राहणार नाही याची काळजी घ्या. कर्क – व्यापार व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे आपले काम चांगल्याप्रकारे होतील. जर आपण कलाक्षेत्र, साहित्य याच्यामध्ये…
प्रवीण पुरो | बुधवार, १६ ऑक्टोबर मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन २४ तासांचा अवधीही झाला नाही, तोच महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. जानकर यांचा पक्ष आता राज्यात २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात आपल्या पक्षाला विचारात घेतलं गेलं नसल्याच्या कारणाने महादेव जानकर यांनी हा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला, अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख जानकर यांनी महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. जानकर यांच्या निर्णयामुळे महायुतीला मोठं खिंडार पडलं आहे. महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी एक-दोन दिवसात जाहीर होणार असून, त्यात…
