Author: अनंत पांगारकर
संगमनेर- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. विकास क्रांती सेनेसह विविध रेल्वे कृती समित्यांनी येत्या १२ जानेवारीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्वांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आपल्या मागण्या कळवल्या असून आता १२ जानेवारीच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता या बहुउद्देशीय पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, परंतु घरातील व्यक्तींशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. व्यापारात नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मिथुन – आजचा दिवस धावपळीचा आणि कष्टाचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे तुम्हाला थोडा ताण जाणवेल. आर्थिक देवाणघेवाण…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि धाडसाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभल्याने जुनी देणी पूर्ण होण्यास मदत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील, मात्र बोलताना शब्दांचा वापर जपून करणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याचे योग असले तरी वायफळ खर्च टाळणे गरजेचे आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि एकमेकांना समजून घेतल्यामुळे घरातील वातावरण शांत राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित…
अहिल्यानगर – शिर्डी परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. शिर्डीतील हॉटेल रेणुका जवळील काटवनात दबा धरून बसलेल्या या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी दीपक किसन जाधव (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) यांचा मुलगा निलेश हा शिर्डीहून सावळविहीर येथे जात होता. यावेळी आरोपी पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख आणि त्याच्या साथीदारांनी निलेशला रस्त्यात अडवले. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय…
संगमनेर, प्रतिनिधी- तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून संगमनेरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, काँग्रेसने सत्ताधारी विखे-खताळ जोडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पडलेली असताना पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. या निव्वळ दुर्लक्षामुळेच १६ गावांवर तहानेची वेळ आली असून, या वाताहतीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळच पूर्णतः जबाबदार आहेत. आता निवडणुका जवळ आल्यावर जनतेचा रोष पाहून यांना योजनेची आठवण झाली का? असा जळजळीत सवाल काँग्रेस पदाधिकारी सचिन दिघे यांनी उपस्थित केला आहे. सचिन दिघे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ही योजना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळाल्याने गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल, मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. विचारांमध्ये…
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीर केलेल्या किती योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्या याचा विचार केला तर देश किती मागे सरकतो आहे, याचं वास्तव लक्षात येईल. 2014 नंतर देशात झालेल्या बदलाचा काळ हा नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचा काळ असल्याचा आव आणणार्या कंगना राणावत हिच्या वक्तव्याची लोकांनी चिरफाड केली तरी सरकार मात्र त्याच मानसिकतेत कारभार हाकत असल्याचं चित्र आहे. योजना जाहीर करायच्या. त्यांचं पुढे काय होतं, याचा विचार ना सरकार करत ना त्यांना कोणी जाब विचारत. आता तर जाब विचारायचं स्वातंत्र्यच कोणाला राहिलेलं नाही. जनतेला लुभावण्यासाठी सरकारने नऊ योजना जाहीर केल्या. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले. पण त्यातून बाहेर आला मोठा भोपळा. प्रकल्प जसजसे…
संगमनेर | प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले असून विकासकामांच्या श्रेयावरून आता थेट ‘क्रेडिट वॉर’ सुरू झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात ज्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे, ती सर्व कामे मुळात लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेली आहेत. हा सर्व प्रकार निव्वळ ‘स्टंटबाजी’ असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, अशी घणाघाती टीका संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वागण्यामुळे संगमनेरच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला छेद दिला जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. अजय फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला…
श्रीरामपूर – राजकारणात यश मिळवणे सोपे असते, पण संघर्ष आणि अपमानातून तावून सुलाखून निघत जनमाणसात स्थान निर्माण करणे कठीण असते. श्रीरामपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाची दखल घेत राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने त्यांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. करण ससाणे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केल्यास, त्यांची ही वाटचाल अतिशय खडतर राहिली आहे. अनुराधा आदिक नगराध्यक्ष असताना करण ससाणे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते. राजकारणात नवखे असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला; त्यांचे वडील आणि आधारस्तंभ माजी आमदार जयंतराव ससाणे यांचे निधन झाले. या दुखाच्या काळात सावरत असतानाच त्यांना…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मोठी क्रांती होणार आहे. यामुळे कामाच्या पद्धती आणि नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असले, तरी नवीन संधींची दारेही उघडणार आहेत. म्हणूनच प्रत्येक तरुणाने या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एआयच्या युगात जे सातत्याने शिकतील, तेच टिकतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संशोधक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था आणि ‘डबल डेकर ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील चर्चासत्रात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, एआय तंत्रज्ञ डॉ. सुयश गुंजाळ, दुर्गाताई…
