Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाशिवाय ७०० जागांवर नोकर भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून या नोकर भरतीला स्थगिती देण्याची मागणी पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. बँकेच्या आरक्षणाशिवाय होणाऱ्या नोकर भरती निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले आहे. यावेळी हिरालाल पगडाल, अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर राक्षे, के. जी. भालेराव, राजीव साळवे, अरविंद सांगळे, फ्रान्सिस सोनवणे, सुनील क्षेत्रे, प्रा. भीमराव पगारे, सुभाष ब्राह्मणे, राजाभाऊ अवसक, नितीन कसबेकर, सिताराम राऊत, अनिकेत घुले आधी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याचे अग्रेसर बँक…
मुंबई : महायुती सरकारने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर केल्यानंतर भाजपाने नव्या प्रयोगाची तयारी सुरू केली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये भाजपाचे मंत्री पालकमंत्री आहेत. उर्वरित १६ जिल्ह्यांमध्ये भाजपाने ज्येष्ठ नेत्यांकडे संपर्क प्रमुख या पदाची जबाबदारी देण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या आणि सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना पालकमंत्री केले आहे. याच १६ जिल्ह्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते संपर्क प्रमुख म्हणून काम करणार आहेत. भाजपाचे संपर्क प्रमुख सरकार आणि स्थानिकांमधील दुवा म्हणून पक्षाच्यावतीने काम करतील. मित्र पक्षांच्या पालकमंत्र्यांचे निर्णय भाजपासाठी त्रासदायक ठरू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतील. भाजपाच्या या हालचाली म्हणजे मित्र पक्षांवर राजकीय कुरघोडीचा प्रयत्न असल्याची…
मुंबई – राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय महसूल आयुक्तांना दिले आहेत. शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत. जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे, वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तोपर्यंत शासकीय योजनांनाही अर्थ उरणार नाही. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महसूल यंत्रणा, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देशही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. दोन अपर जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करण्याबाबात प्रस्ताव सादर करा, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले.
मुंबई : बदलापूर डोंबिवलीनंतर आता मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या स्टेशन परिसरात एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात ब्लेड आणि दगड लपवल्याची घटना घडली आहे. राम मंदिर स्टेशनच्या आवारात २० वर्षीय तरूणी बेशुद्ध अवस्थेत आढळली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. राम मंदिर स्टेशन परिसरात पीडित २० वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळली. बेशुद्ध अवस्थेतील या तरुणीला मंगळवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या गुप्तांगातील ब्लेड व दगड काढण्यात आले आहेत. शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी या तरुणीचा जवाब नोंदवला असून तिने जवाबात एका रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने सांगितले. नराधम…
संगमनेर – ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चपळगावकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या आखिल भारतीय सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील व सत्त्वशील मराठी लेखक म्हणून त्यांची ख्याती राहिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो. नरेंद्र चपळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! https://x.com/bb_thorat/status/1883033860524437607?t=TmNELHXoHd0bb6hh5Yea-A&s=19 अशा आशयाची श्रद्धांजली बाळासाहेब थोरात यांनी आपल्या…
छत्रपती संभाजीनगर – माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज शनिवारी (२५ जानेवारी) निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. तसेच न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी भूमिका बजावली. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. साहित्य क्षेत्रात न्यायाच्या गोष्टी, संघर्ष आणि शहाणपण, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, कायदा आणि माणूस, समाज आणि संस्कृती, सावलीचा शोध आदी पुस्तके प्रसिद्ध आहे. चपळगावकर यांनी १९६२ ते…
मुंबई, दि. २५ : नव्या महायुती सरकारच्या काळात राज्यातील नागरिकांचा प्रवास महाग झाला आहे. प्रवाशांच्या खिशाला तब्बल पंधरा टक्के झटका देण्यात आला असून हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक २५ जानेवारी पासून (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) अंमलात येत असल्याची माहिती राज्य परिवहन प्राधिकरणाने दिली आहे. या कारणासाठी भाडेवाढ – वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन…
मुंबई, दि. २५ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पावले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्तेकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री शाह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२४ जानेवारी) गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमान चालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,…
मुंबई, दि. २४ : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला. आता ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार…
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘ट्रूथ अँड डेअर’च्या गेममध्ये हरलेल्या १७ वर्षीय तरुणीवर २२ वर्षीय मित्रांनीच बलात्कार केल्याची बातमी समोर आल्यानंतर पुण्यात नेमकं चाललय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतो पण अलीकडे याच पुणे शहरात गुन्हेगारी वाढीस लागली आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, ड्रिंक अँड ड्राईव्ह, आत्महत्या या अशा घटनांमध्ये पुणे मागे राहिलेलं नाही. पुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. याच विद्येच्या माहेरघरात ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी आली आहे. पिंपरी-चिंचवड येथे शिक्षणाच्या निमित्ताने १७ वर्षीय तरुणी राहत होती. पाच वर्षांपूर्वी पीडित मुलीची आणि एका २२ वर्षीय तरुणीची ‘इन्स्ट्राग्राम’वर ओळख झाली.…
