Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेटसमोरील हॉटेल स्टेटसजवळील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३८ कोटी रुपये निधीतून साकारत असलेला हा उड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून अपघातांना आळा घालणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. माझे घर सोसायटी परिसरातील नागरिकांसाठी हा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या ठिकाणी होणारे अपघात लक्षात घेता, थोरात यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी निधी मिळवला होता. सुरुवातीला एका बाजूचे काम पूर्ण झाले असले, तरी दुसऱ्या बाजूचे काम काही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एका हॅकरने प्रवेश करत एपीके (APK) फाईल शेअर केली. या फाईलवर क्लिक करताच एका पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल साडेसात लाख रुपयांना फसवणुकीचा फटका बसला आहे. सायबर भामट्याने त्यांच्या नावाने कर्ज काढून ती रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस आणि सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणारे एक पोलीस शिपाई सप्टेंबर २०२४ पासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार आणि…
मुंबई: नियंत्रक शिधा वाटप व संचालक कार्यालयातील मुख्य निरीक्षण अधिकारी विनायक वसंत निकम याला गॅस एजन्सी चालकाकडून १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल, (२९ जुलै) रंगेहाथ पकडले. निकमने मासिक ‘हफ्ता’ म्हणून ही रक्कम मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कांदिवली येथील एका गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या नातेवाईकांची ठाण्यात गॅस एजन्सी आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर, तर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या ठाणे येथील गॅस एजन्सीवर कारवाई केली होती. १६ जुलै २०२५ रोजी निकमने तक्रारदारांना कार्यालयात बोलावले. १७ जुलै रोजी झालेल्या भेटीत निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर पुढील कारवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (आज) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते. या निर्णयांमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करणे, १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारणे, ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे, अशा विविध घोषणांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने घेतलेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे: * ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबवले जाईल. एकूण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: आमदार सत्यजित तांबे मित्र परिवार आणि जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यावतीने संगमनेरकरांना नागपंचमीच्या शुभेच्छा देणारा फलक विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार मंगळवारी पुन्हा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात राजकीय वर्चस्वातून फ्लेक्स फाडले जात आहेत की नशेडी, गंजडी हे प्रकार करत आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या मुक्त आशीर्वादाने संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू आहे. आम्हीच कसे समाजाचे उद्धारकर्ते आहोत हे फ्लेक्स च्या माध्यमातून दाखविण्याच्या नादात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – अनंत पांगारकर – संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आमदार सत्यजित तांबे यांनी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीत कार्यरत असलेल्या तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील यांच्यासह समाजातील विविध घटकांचे ११४ प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. या सर्व प्रश्नांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आणि आगामी काळात त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सोशल माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले. संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एनएसयूआय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – अहिल्यानगर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा मोठ्या वादंगात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण आले असून, देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी आधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी संशयास्पद परिस्थितीत राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शनिशिंगणापूर आणि अहमदनगर जिल्ह्याभरात “देवस्थानातील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि चौकशीच्या भीतीमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का?” अशा चर्चांना उधाण आले आहे. गावातील अनेक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – पुणे: दारूचे व्यसन सोडण्यास नकार देणाऱ्या पतीसोबत नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती प्रेम जाधव (वय २७) याला अटक करण्यात आली आहे. ममता जाधव (वय २१) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ममता जाधव आणि आरोपी प्रेम जाधव यांचा विवाह २०२० मध्ये झाला होता. प्रेम जाधव याला दारूचे व्यसन होते. ममता वारंवार दारू सोडण्याची विनंती करत होती, परंतु प्रेम दारू सोडत नव्हता. याच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहुरी: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या नफ्यात व काटकसरीने चालवण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचे, फळबाग…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का बसला आहे. तब्बल २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांपैकी २६ लाख ३४ हजार लाभार्थी विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेचा लाभ १४ हजार २९८ पुरुषांनीही घेतल्याचे उघड झाले आहे. या अपात्र लाभार्थ्यांमुळे गेल्या वर्षभरात राज्याचे सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी (२७ जुलै) समाजमाध्यमांवर स्वतः अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या योजनेतील अर्जांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात…
