Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज एक महिना झाला, मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गु्न्हा दाखल नाही. यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त होत आहे. राज्यातील सरपंचांनी आझाद मैदानात परिषदेचे आयोजन करुन संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला. या परिषदेला भाजपचे आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुखची हत्या आपल्याला विसरायची नाही. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका. त्यासोबतच आमदार धस यांनी सरकारकड आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, अशी मागणी केली. संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येनंतर…
संगमनेर – संगमनेर शहर व तालुक्यात विशिष्ट राजकीय पक्षांचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स हे अनाधिकृत व अधिकृत वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ ठेवले गेले आहेत. प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष होणे हे अत्यंत चुकीचे असून संगमनेर शहरामध्ये मुख्याधिकारी व तालुक्यामध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने सूचना देऊन हे सर्व फ्लेक्स त्वरित काढावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, निवडणुका झाल्यानंतर अनेक दिवसांपासून काही पक्षांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांचे फ्लेक्स संगमनेर बस स्थानक परिसर व संपूर्ण शहरांमध्ये आहे. याला कोणतीही परवानगी नाही. किंवा परवानगीच्या मुदती…
संगमनेर – खाजगी क्लास संपवून बस स्टॅन्ड कडे जाणाऱ्या महाविद्यालयातील अल्पवयीन मुलींची छेड काढत विनयभंग व लज्जास्पद वर्तन करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश राजेंद्र वाडेकर (रा. चास पिंपळदरी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, पीडित फिर्यादी तरुणी दररोज तालुक्यातील एका गावाहून संगमनेरला एसटी बसने आपल्या मैत्रिणीसह ये-जा करते. सोमवारी दुपारी ती संगमनेरमध्ये आली होती. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास क्लास संपवून ती मैत्रिणीसह गावाकडे…
मुंबई, दि. ७ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे दिलेल्या मुदतीत गतीने पूर्ण करावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळांच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात सोमवारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे.…
विशेष प्रतिनिधी / मुंबई बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. देशमुख यांची निर्घृण हत्या आणि सुरू असलेल्या खंडणीखोरीच्या कारवायांमुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात राहिलेली नाही, असा आरोप शिष्टमंडळाने केलाय. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केलीय. माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटलेल्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांचा…
सोमवार, ०६ जानेवारी संगमनेर – नाशिक-पुणे मार्गावर बस स्थानकानजीक दारूच्या नशेत तर्र झालेल्या मद्यपी तरुणाने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास विश्रामगृहासमोर चार मुलींची छेडछाड केली. त्यामुळे नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडत चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. मद्यपी तरुणाने मुलींची छेडछाड केल्याने येथे काही वेळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सोमवारी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नाशिक पुणे मार्गावरून शासकीय विश्रामगृहापासून शहरातील चार मुली जात असताना या ठिकाणी असलेल्या व अकोले तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका मद्यपी तरुणाने या मुलींची छेड काढली. घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडले. छेड काढणाऱ्या या तरुणाची नागरिकांनी चांगलीच धुलाई…
विशेष प्रतिनिधी / मुंबई मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पत्रकार (मुद्रित) राज्यस्तरीय पुरस्कारासाठी लोकमत ‘सातारा’च्या प्रतिनिधी श्रीमती प्रगती पाटील यांची तर वृत्तवाहिनी उत्कृष्ट पत्रकार (दृकश्राव्य) पुरस्कारासाठी ‘एबीपी माझा’चे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा उत्कृष्ट सदस्य पुरस्कार ‘पुढारी’चे राजन शेलार यांना जाहीर झाला आहे. ६ जानेवारीला पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केली. …
संगमनेर – विधानसभा निवडणुकीत संगमनेरात सत्ता बदल झाल्यानंतर येथील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. लोकविकास आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा राहत असून होऊ घातलेल्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविली जाणार असून या संदर्भातील कृती कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे रजत अवसक व दत्ता ढगे यांनी दिली. स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानमध्ये लोकशाही समाजवादी विचारांच्या नागरिकांची व्यापक बैठक पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमामाई शेख यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात झाली होती. बैठकीत भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या लोकशाही समाजवादी विचारांचे राजकीय सामाजिक व सांस्कृतिक काम उभे करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच लोकविकास आघाडीच्या…
संगमनेर – संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू तालुक्यातील समनापुर येथील सुरू असलेल्या पोक्सो संदर्भातील विशेष खटल्यात न्यायालयाने ६ महिलांसह ३ पुरुष आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. अवघ्या दोन वर्षात निकाली निघालेल्या या खटल्याकडे लक्ष लागले होते. समनापुर (संगमनेर) येथे फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या जमिनीवरून चुलत भाऊ व भावांसोबत न्यायालयात वाद सुरू होते. २ जुलै २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी संगणमताने आलेल्या आरोपींनी फिर्यादीला पाया खोदण्यास मनाई केली. फिर्यादी व तिच्या बहिणींना शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी आरोपीपैकी एकाने जवळच पडलेली व बांधकामासाठी आणलेली वीट उचलून फिर्यादीच्या पाठीत फेकून मारली. तर…
संगमनेर – शहरातील दिल्ली नाका येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी अखेर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. अखेरीस गुन्हा दाखल झाल्याने आता या गुन्ह्याच्या तपासाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी विकास दीपक गायकवाड (रा. निळवंडे, संगमनेर) याच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११९(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(१) नुसार लकी पान स्टॉल दुकानातील इसम व अनोळखी १५ ते २० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी त्यांच्या दोन मित्रांसोबत पान…
